लाल बाग़ परल नविन चित्रपट.
गिरण गावावर आधारित नविन चित्रपट रविवारी पाहिला.खुप गोष्टी पटल्या नाहीत.त्या वेळी जे गिरणी कामगार होते त्यांचे विदारक चित्र मांडले आहे,हे नक्की.पण सर्व कामगार काही दारू पीत आयुष्य घालवत नव्हते.काही घरातील स्त्रिया कामे करून मोल मजूरी करून संसार रथ चालवत होत्या.मुले नकळत समंजस झाली होती. काही नोकरदार लोकानी मिळेल ते काम करून ,नविन काही शिकून आपले कर्तव्य पार पाडले आहे.कुठच एकदाही या चित्रपटात सकारात्मक दाखवले नाही असे जाणवले. मुली बायका वाम मार्गाला सगल्या काही लागल्या नाहीत.मारामार्या आणि गोलीबार जास्त प्रकर्षाने दाखवले आहे.
मालकाने जमीनी विकून तिकडे शोपिंग सेंटर सुरु केले.हे सत्य आहे.कामगाराना काहीही फायदा झाला नाही.सरकार ने काहीही केले नाही.हे का दाखवले नाही??????????पक्ष आले गेले,सत्ता आली त्यानी काहीही केले नाही.यातून नक्की काय दाखवले??????/
श्री.महेश मांज्रेकर यांच्या कडून खुप वेगळ्या अपेक्षा होत्या.
Friday, April 16, 2010
Subscribe to:
Posts (Atom)