Friday, November 27, 2009

                               माझ्या या इकडच्या वास्तव्यात मी अनिकेत च्या ३ मित्रांकडे पार्टी ला [जेवायला]गेले.दिवाली च्या दिवशी शिल्पा-दिनेश यांच्या कड़े गेलो होतो.शिल्पा आणि नंदिनी एकत्र काम करतात.त्यामुले त्यांची पण चांगली मैत्री झाली आहे.शिल्पा घरी आली होती,पार्क मधे आली होती,त्या मुले ओळख झाली होती.
                             दिवाली म्हणून आम्ही रवि -रिचा,वेकट-वैजू याना घरी बोलावले होते.त्यामुले त्यांची पण छान ओळख झाली.वेंकट चे नाव मी अनिकेत कडून खुप वेळा एइकले होते.आधी तो डोम्बिवली ला राहणारा.जुन्या आठवणी काढून गप्पा मारल्या.
                               वैजू ने सर्व मित्र मैत्रिणी ना घरी वडा-पाव पार्टी ला बोलावले होते.नविन मित्र आले होते,ओळख झाली.गप्पा मारल्या वेळ छान गेला.
                                रवि-रिचा शेजारी असल्याने माझे अगदी पहिल्या दिवसापासून माझे जाणे येणे सुरु झाले होते. त्याना  पण घरी मेहुंन  म्हणून बोलावले होते.रिचा कड़े मी २/३ वेळा गेले जेवायला.दर वेळी मेनू वेगला ही तिची खासियत.थाय करी भात,पास्ता,तुर्की मिठाई असा वेगला बेत होता.माझी आवडती डीश ओली भेल आणि चहा यानि सुरवात झाली.मस्त गप्पा मारत जेवलो.आशीष ,मिनी पण आले होते.छोटा आरुष मस्त टाइमपास करत होता.रिचा चे घर अगदी टाप टिप ,नीट नेटके असते.कामा वरून घरी येवून सर्व तयार करून ठेवले होते,मला कौतुक वाटले. कोकणस्थ साटप असतात हे मला परदेशात पण जाणवले.    























Wednesday, November 25, 2009

ek anubhav

  •                            मी अनिकेत नंदिनी बरोबर घर पहायला गेले होते.त्यांच्या घराचा करार डिसेम्बर ला संपतो.म्हणून घराची शोधाशोध सुरु आहे.सुधारलेल्या देशात सर्व काही सुधारलेले.इकडे घरावर टी हुर्र अशी पाटीलावलेली असते.टी हुर्र म्हणजे घर भाड्याने देने आहे,तर टी कूप म्हणजे घर विकने आहे.फिरताना खुप घरावर अशा पाट्या दिसल्या.स्थायिक यूरोपियन लोकानी घरे पूर्वी घेउन ठेवली आहेत,आता तेच त्यांचे उत्पन्नाचे साधन झाले आहे.घरे दाखवणारे एजेंट घराचे फोटो माहिती सर्व इन्टरनेट वर देतात.नकाशा वर घर कुठे ते पाहता येते.रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे असतात.[इमारती]पण घरावर जे क्रमांक असतात ते एका बाजूला सम आणि दुसर्या बाजूला विषम असतात.लांबच लाम्ब रस्ता आणि क्रमांक ,गल्या [लेन]शोधत जावे लागते.अगदी पून्याची आठवण येते.
                 घर दाखवणारा एजेंट पण सुटाबुतात गाड़ी घेउन आला होता.आम्ही जे घर पाहिले ते दुसर्या मजल्यावर होते,सरळ एकच जीना.इकडे बरीच घरे अशी आहेत,तळ मजला आणि पाहिला मजला एकाकडे आणि दूसरा तीसरा स्वतंत्र.बहुतांशी घरे फर्निश असतात.४ खोल्या आणि गच्ची .घर सुसज्ज होते.घरे पाहण्याची सुरवात चांगली झाली.घर प्रशस्त हवेशीर होते.आणि भाड़े पण परवडेल असे होते.फक्त त्या घरात डीश वाशर नाही,त्यामुले घेणे योग्य नाही असे ठरले.इकडे सर्व घरात असतो.हे लोक तेलकट तुपकट काही खात नाहीत,विशेष घरी काही शिजवत नाहीत,त्यामुले स्वय पाक घरे अगदी स्वच्छ ,चकचकीत असतात.आपल्यासारखा सतत गैस पेटत नाही.मायक्रोवेव्ह मधे काय ते गरम करून खायचे हीच त्यांची पद्धत.इतर वेळी  ज्यूस ,बीअर पिणे.
  •                नंतर  एक होलैंड चा खुप मोठा कसीनो पाहिला.त्या सर्व भागात फक्त बार आणि रेस्टोरंट होती.बाहेर मेनू लावलेला होता ,कीमती सह .काचेच्या शोकेस मधे छापील मेनू.पाट्या नाहीत.प्रत्येक होटेलची खासियत असलेले पदार्थ असतात,माहिती पाहिजे.
  • मुख्य रोड वर सर्व नामांकित कंपन्यांची दुकाने [शो रूम]होत्या.आपल्या कडील कुलाबा तसा तो भाग.नंदिनी माहिती देत होती दुकानांची.
  • एका ठिकाणी मुले स्केटिंग करत होती,यंत्राने भुर भुर बर्फ पडत होता.मुले मस्त मजा करत होती,पाहून गम्मत वाटली,असे सर्व मुलाना मिळाले की काय खुश राहणार मुले....सर्व ठिकाणी झगमगाट असलेला भाग पाहून घरी आलो.

Tuesday, November 24, 2009

pardesh gaman anjbhav

                                             परदेश गमनाचे वारे वाहू लागले आणि तयारी ला जोर आला.वीसा घरी आल्यावर मात्र हातपाय भरभर हलू लागले.बघता बघता मी पहिला विमान प्रवास करून अनिकेत कड़े आले.८ सप्टेम्बर ला.तेव्हा पासून चे माझे अनुभव मी ब्लॉग मधे लिहायचा प्रयत्न केला आहे.पूर्वी मला परदेशात येण्यात काही स्वारस्य वाटत नव्हते,इतरासरखे आकर्षण पण नव्हते.पण एकदा मनाची तयारी करून अनिकेत कड़े आले.फक्त ३ महीने वास्तव्य आहे ठीक आहे,जातील दिवस पटकन.असे वाटले,आणि सुरवातीला तसे झालेही.नव्याची नवलाई होती,नविन शहर कसे आहे याची माहिती करून घेत होते,खुप वर्षानी मी आणि अनिकेत गप्पा मारत फिरलो,तेव्हा काय वाटले कसे सांगू???अनिकेत मधे खुप चांगला बदल झाला आहे असे जाणवले.लगेच एक महिन्याच्या आत त्याने मला स्वप्न नगरिची सफर घडवली.तेव्हा तर काय मला खुपच आनंद झाला होता.मनात खुप वेळा२ विचार सतत यायचे,अशा या रम्य ठिकाणी आपण एकटेच आलो आहोत,मला ह्यांची उणीव खुप वेळा होत असे.पण काय करणार??आपले नशीब.आपले दुख आपल्याशी ठेवायचे त्याचे भांडवल करायचे नाही हे मनाशी पक्के केलेले आहे.त्यामुले कुणाला जाणीव करून देत नसे.आणि दूसरा विचार ती दोघेच इकडे आली असती तर ,त्यानी आणखी मजा केलि असती,माझ्या मुले त्याना स्वतंत्रता मिळत नाही असे सारखे वाटत होते.पण इतर अनोल्खी लोकान पेक्षा मी मुलासुने बरोबर आले याचा आनंद आधिक होता.
                                  परदेश वास्तव्याचे ३ टप्पे केले तर माझा पहिला महिना पटकन निघून गेला.सतत फिरने गप्पा सुरु होत्या.पण दुसर्या महिन्यात मला घर दिसू लागले.कधीच मी बाहेर इतके दिवस राहिले नाही.त्यानी माझे मन कशातच रमत नव्हते.इकडे ठंडी ची लाट ही तेव्हाच आली.आता ही थंडी कशी सोसणार?घरी बसून वेळ कसा घालवायचा?????या विचाराने मन खुप वेळा उदास होत असे.ही दोघे मला उपाय सांगत असत ,पण मला ते काही पचनी पडत नव्हते.अखेर मी परत यावे या विचाराला आले.तसे अनिकेत भाग्यश्री जवळ बोलले पण.हा माझा विचार काही पट्नारा नव्हता.पण मला खरच काय करावे सुचत नव्हते.अस्वस्थ मनाने रहाणे काही अर्थ नव्हता.भाग्यश्री ने टिकिताची चौकशी केलि.मनात चलबिचल सुरु झाली.पण अखेर या वेळी मला माझ्या गणपतिने [देवाने]सद्विचार दिला.आणि मी लवकर परत न जाता थोड़े दिवस आहेत ते आनंदाने रहायचे हा विचार पक्का केला.विचार करने ,बेत आखाने सोपे असते पण कृतित आनने कठिन जाते.पण तेहि केले.
                                   परत घरी जाताना ची खरेदी मी आणि नंदिनी ने एका दिवशी उरकून टाकली.तेव्हा सामानाचे वजन जास्त होइल हा विचारही दोघिनी केला नाही.पण आता माझे कपडे ठेवून जायचे या विचाराला मी पोचले ,हे ही नसे थोडके!!!
                                    परदेश पहिल्या शिवाय आवडत नाही हे मी अनुभवाने सांगते.मला इकडे शुद्ध हवा,मुबलक पानी,विज ,नयन रम्य निसर्ग सौन्दर्य ,सर्वे सुखसोयी आहेत.फुटपाथ ,रहदारी कमी,जाने येणे प्रवास सुखकर.हे सर्वे अवड्त असे.चालायला फिरायला आवडत असे.बाजारात जाऊ लागले,मनात तुलना करत असे,पण तरी रोजचे जीवन चांगले आहे .हे नक्की.पण   ..........खर सांगू का????????
                      बहु असोत संपन्न की महा ,प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
                                              परदेशात राहणारी मुले आधिक वेळ घरी रहातात,आपल्या सारखा नाका नसतो,आणि खुप खास मित्र पण नसतात.चक्क माझा वेळ जावा म्हणून आम्ही कितीतरी वेळा पत्ते खेलत असो.अनिकेत च्या आवडीचे पदार्थ करण्यात मी पुढाकार घेत असे,माझे पोथी वाचन पूर्ण झाले,त्याचे मेहुंन पण जेवू घातले,परदेशात मला चक्क घारपुरे जोडपे भेटले,[अनिकेत चा मित्र]पूरण पोली चे जेवण केले,रुपयात नाही ,यूरो मधे दक्षिणा पण दिली.सुधारक देशातील ते मेहुंन वेस्टर्न कपडे घातलेले.बुट घालून टेबल वर जेवायला बसले.पण इकडे ठीक आहे.आपण आपले विचार,संस्कार बाजूला ठेवून वागलो तर पुढच्या पीढ़ी बरोबर दिवस चांगले जातात हा विचार केला.शांत राहिले,आपल्या मुलांवर संस्कार असतात,पण परदेशात गेल्यावर त्याचे काय होते ,देव जाणे....
        कालाय तस्मै नम्हा!!!!!!!!!!!!
              आता माझे घरी जायचे दिवस जवळ आले,एकच आठवडा राहिला.आता मात्र माझी स्व देशातील लोकाना भेटण्याची ओढ़ वाढू लागली,पण त्याच वेळी आता अनिकेत नंदिनी दोघे लवकर भेटणार नाहीत,असे सारखे मनात येवू लागले.मग मी मे मधे आंबे खायला तुम्ही तिकडे या,भुन भुन सुरु केलि.पण अनिकेत तो....असा सहज पट्नारा थोडीच.त्याने मला तू समर मधे इकडे ये.तुला घरी तरी काय काम आहे?????असे बोलून माझा ब्रेन वाश सुरु केला.
             बदल इतका की आधी परदेशात स्वारस्य नसलेली मी,आता पुढील समर मधे नक्की येइन असे सांगू लागले.मला देश आवडला,अनिकेत बरोबर,नंदिनी बरोबर राहता आले,म्हनुनच हा बदल माझ्यात झाला.
            पण नंतर येताना मनाची पक्की तयारी करून,वेळ जावा या साठी पुस्तके,सीडीज ,भरतकाम बरोबर घेउन आलो पाहिजे तरच वेळ आनंदात जाइल हे नक्की.
                     आज सकाळी अनिकेत च्या आवडीचा सफेद ढोकला,आणि लसून चटनी.[शिल्पा मामी पद्धत]बनवली.खुप दिवसानी केल्याने पोटभर आवडीने त्यानी खाल्ला.नंतर आवरून आम्ही बाहेर पडलो.खास लोकाची खरेदी!!!कोण ते कलले ना?लाडकी लेक आणि जावई.प्रथम जावयाची की लेकीची प्रश्न होता.प्रथम सौरभ साठी टी शर्ट बघायला सुरवात केली.पण अनेक दुकाने बघून एकमत काही होइना,अखेर शर्ट बघा असे मी सांगुन टाकले.मग शर्ट बघणे मिशन सुरु झाले,तिघांची आवड भिन्न .पण अखेर एक शर्ट फायनल केला.खर सांगायचे तर अजुन मला सौरभ ची आवड काय ?त्याला कसे कपडे आवडतात ते कलले नाही.नंतर मोर्चा भाग्यश्री च्या खरेदी कड़े.मोठा कठिन प्रश्न?पण सुरवात केली "स्वरोस्की"पासून पण पुन्हा तोच प्रश्न.अनिकेत ला आवडेल जरा दिव्य !!!त्याचा बजेट चा प्रश्न नव्हता पण हा दगड च वाटतो वगैरे टिका सुरु होत्या.इकडे तिकडे बघताना हैण्ड पर्स दिसल्या,"ब्राण्डेड बर का?"सर्व पर्स उघडून हातात धरून नंदिनी ने बघितल्या,नंतर ३ पर्स मधून निवड.अनिकेत ची टिका सुरु होतीच.पण अखेर मी एक पर्स फायनल केली.शर्ट आणि पर्स चे पैसे देवून आम्ही जवळ दुसर्या दुकानात गेलो.
                    तो मेघना मोल  होता.सरकत्या जिन्या वरून वर जातो तो समोर स्वरोस्की दुकान.धन्य वाटले!!
सर्व आकर्षक वस्तु,अलंकार छान मांडून ठेवले होते.परत पहाणे सुरु,अनिकेत ने आता माघार घेतली होती,तुम्हाला काय आवडेल ते घ्या सांगुन टाकले.नंदिनी ने २ सेट पसंद केले.त्या पैकी मला जो आवडला तो मी सांगुन टाकला,तो त्या पेक्षा महाग होता.पण माझे मत विचारले मी सांगुन टाकले....लेकिसाठीआई ने आज बिनधास्त पणे सांगितले.अनिकेत ने मला टोमणा पण मारला.पण खास खरेदी ख़रच मस्त झाली,अनिकेत चा खिसा खाली केला हे मात्र नक्क्की ......नंतर इकडे तिकडे वेळ घालवून घरी आलो.येताना टर्किश डोनर घेउन आलो,चहा आणि डोनर याचा आस्वाद घेतला......

sankalp

                        मी इकडे येताना 'गुरु चरित्र' संक्षिप्त ही पोथी बरोबर आणली होती.येतानाच संकल्प केला होता.इकडे आपण या पोथीचे १०० वेळा वाचन करायचे.काही मनात धरून हा संकल्प.त्याप्रमाणे पोथीचे वाचन १७/११/०९ रोजी पूर्ण झाले.नंदिनी शी सहजच बोलले आपण इकडे एक म्हणून मेहुंन जेवायला बोलवू  या.लगेच तिने बेत आखला.आणि अनिकेत चा मित्र रवि घारपुरे आणि रिचा याना जेवायला बोलावले.परदेशात त्याना असे मेहुंन जेवायला बोलावले,याची गम्मत वाटली.आनंदाने आले.पोटभर जेवले,खुप गप्पा मारल्या.मसाले भात,सार कोशिंबीर,पोली दम आलू भाजी आणि पूरण पोली असा बेत केला होता.पूरण यंत्र नव्हते त्या मुले पुरनाचे पराठे झाले.अनिकेत ने त्याना ११ यूरो दक्षिणा पण दिली.मला समाधान वाटले,आणि माझा सम्पूर्ण दिवस पण छान गेला.