Thursday, May 19, 2011

पहिला वीकएंड

अश्विनी आल्यावर परत आम्ही सर्व एकत्र जेवलो.त्या नंतर अनिकेत अमोल कामावर गेले.मी नंदिनी आणि अश्विनी कटी तरी तास सोफ्यावर बसून गप्पा मारत होतो.एकदाच्या सर्व लोकांना या मुलीच्या भाषेत कुटून काढले.एकीकडे अश्विनी अक्षराची काळजी घेत हती.तिला खाऊ पिऊ घालत होती.एकट्या मुली रहिल्या कि त्यांना लहान मुलांचे संगोपन चांगले जमते,याची परत एकदा जाणीव झाली.

नंतर आम्ही बाहेर पडलो. अचानक मंजिरी कडे जायचा बेत ठरला.त्यावेळी मी लगेच खाऊ आणि खरेदी केलेल्या वस्तू पिशवीत भरल्या,सर्व गिफ्ट पण मंजिरी कडे जाताना बस stop पासून थोडे अंतर चालत जावे लागते.इकडचे विशेष म्हणजे सरळ सपाट भाग नाही. रस्त्यावरून थोडेसे चढावावर चढून जावे लागते.उंच सकाळ भाग खूप आहे.मंजिरी च्या घरची बेल वाजवली.गेट उघडून दारापर्यंत १०/१५ पायर्या उतरून जावे लागते.दोन्ही बाजूला छान वेळी फुलझाडे बघून बंगल्याची कल्पना आली.मंजिरी चे घर किती प्रशस्त आहे सांगू?तळ मजल्यावर मोठे २ hall, किचन,डायनिंग रूम,व पाठीमागे डेक खाली मस्त गवत हिरवेगार,फुलझाडे,फळझाडे मस्त,पाठीमागे मोठे गेरेज आणि स्टोर रूम.

पहिल्या मजल्यावर ३ बेडरूम.आयुष ची रूम मला जास्त आवडली.किती पुस्तके इतक्या लहान मुलाकडे गोष्टीची.बाप रे!तो रोज वाचत झोपतो.सवय छान ना लहान पानापासून वाचनाची.त्या नंतर मंजिरी च्या बेडरूम मध्ये बसून आम्ही दोघींनी हितगुज केले.लवकरच ४ दिवस तरी एकत्र राहायचा बेत केला.त्य नंतर दुसर्या मजल्यावर भली मोठी गेस्ट रूम.१० पाहुणे आले तरी काही अडचण नाही.असे छानसे घर पाहून मला अनिरुद्ध चे खूप कौतुक वाटले,आणि समाधान....माही,अक्षरा,आयुष यांच्याशी खेळण्यात कुठे वेळ गेला कळले नाही.

रात्री तिकडे जेवून यायचे ठरले,अनिकेत अनिरुद्ध घरी आल्यावर गप्पा ना अधिक रंग चढला.खूप दिवसांनी पानसे छत्रे एकत्र जेवताना भाग्यश्री ची कमी जाणवली,पण मजा आली.रात्री घरी यायला माझा पाय निघत नव्हता .पण उद्या भेटू ठरवून निघाले.आता रात्री मात्र मला खूप झोप आली होती,आणि दमले पण खूप होते.बडबड न करता,टी.व्ही न पाहता झोपून गेले.

सकाळी उठयावर छान ताजे तवाने वाटत होते.इकडे समर मध्ये सकाळी ४ वाजता उजाडते,समर कसला ??दिवसा १५ ते १७ degree तापमान आणि रात्री १०.मला तर थंडीच वाटते.मुंबई चा उकाडा त्यातून मी इकडे आलेली.सकाळी आम्ही युरोपियन पद्धतीचा चांगला तगडा नाश्ता केला,[sandvich], अंडी,चीज,salaed सर्व शरीरासाठी वजनदार गोष्टी] अनिकेत mittingला आम्ही दोघी mall मध्ये जायला बाहेर पडलो.तिथे आपल्यासारखीच जत्रा होती.असंख्य दुकाने,वेगवेगळे सेल लागलेले,सर्व दुकानात फोरून पायाचे तुकडे पडले.मग जरा mcdonald मध्ये विसावलो.मग पुन्हा फिरस्ती सुरु,अखेर एका दुकानात नंदिनी ने खरेदी केली.त्या नंतर parlour मध्ये गेलो.

इकडे गुजराथी आणि पंजाबी लोक खूप व्यवसाय करतात नंदिनी ने माहिती दिली.इकडे ३ पौंड मध्ये आयब्रो करून मिळतात.मी आपले भारतीय रुपयात २१० रुपये असे मनाशीच म्हटले.पण इकडे एक गोष्ट लक्षात आली,सर्व जण एकत्र भेटले कि कुठे काय केवढ्याला मिळते याची चर्चा करतात.आपल्यकडे तसे होत नाही.भाव इकडे सर्वा ठिकाणी सारखे नसतात.आपल्याकडे फरक असतो पण फारसा नाही.असो.खूप फिरून पाय दुखू लागले.घरी परतलो.विश्रांती घेतली.आम्हला परत रात्री अनिकेत च्या मित्राकडे पार्टी ला जायचे होते.

आता मात्र बाहेर गारठा वाढला होता.झोंबरा वारा खूप होता,पण आवरून निघालो.मला न्यायला अनिरुद्ध आला इतके बरे वाटले.आता चालायची खरच ताकद नव्हती. सर्व एकत्र जमून timepass सुरु.पंजाबी सामोसे,आणि ज्यूस ने सुरवात झाली.इकडच्या पद्धती प्रमाणे आम्ही बायकांनी आधी जेवून घेतले.नंतर पुरुष,खरच बरे वाटले.नाहीतर आपल्याकडे बायकांचे जेवण चुलीत!!या म्हणी प्रमाणे होते.खरच प्रगत देशातील बदल चांगला वाटला.जेवून खाऊन गप्पा मारून रात्री उशिरा घरी परतलो.मुंबई सारखी रहदारी होती.

पार्टी कसली ते सांगायचे राहिलेच कि....मित्राचा मुलगा एक वर्षाचा झाला त्याची पार्टी.आपल्या मुलुंड च्या ४ पटमोठे इकडे एक खेळण्याचे दुकान आहे.० ते १४ वयाच्या मुलामुलींची खेळणी पाहून वेड लागायची वेळ आली होती.एक वर्षाच्या मुलाला काय घ्यावे या बद्धल एक मत झाले आणि आम्ही एक सोफा ची असते तशी खुर्ची घेतली.मस्त pack केलेली.पण त्याला गिफ्ट pack करून देत नाहीत.म्हणून एक भला मोठा पेपर घेतला.मला तिकडे वाल्स ice क्रीम दिसले.अरे आपल्या कडचे इकडे असे वाटले,पण तेव्हा कळले कि ते मूळ इकडचे..

रविवार सकाळ सर्वांनी नाश्ता आणि जेवण या मधील म्हणजे ब्रंच करायचे ठरले,ते सुद्धा चेन्नई डोसा मध्ये.सर्व म्हणजे १२ जण .फोनाफोनी झाली.अनिकेत चा मित्र तिकडे १०.३० ला पोचला.त्या वेळी पानसे छत्रे घरी निवांत होते,तिकडे गेल्यावर समजले त्याला कि आज दुकान उघडणार नाही,परत फोनाफोनी सुरु.मग tutin [एक भाग]ला जायचे ठरले.परत श्याम मला घ्यायला आला.अनिरुद्ध चा तो खरा मित्र,त्याच्या सारखाच शांत,समंजस.आम्ही तिकडे पोचलो.पण तिकडे पण दुकान बंद..मला एकदाची आठवण आली,शिव सेना /म.न.से.कोणीतरी बंद पुकारला कि कसे होते तसे वातावरण होते.इकडे पण सर्व दुकाने दुपारी २ वाजता रविवारी बंद होतात.काही ठराविक बार,पब,दुकाने असतात सुरु.जसे आपल्याकडील २४ तास मेडिकल स्टोर सारखे.अखेर एका चेन्नई डोसा मध्ये गेलो.उडपी पदार्थ सर्वांनी आवडीने खाल्ले.सोबत mango लस्सी ,कॉफ्फी .

आता पेटपूजा झाल्यावर खरेदी ,भाजीपाला किराणा,आंबे,फळे सर्व....आंबे तर सर्वांनी घेतलेच.इकडे सर्व भाज्या फळे मिळतात,अगदी भाजीचे आळु पण.नारळ वड्या करायला नारळ,चिवडा चे सामान मी लगेच घेतले,कारण या वेळी करून आणले नव्हते.सर्व आमच्या घरी आले,परत चहा पाणी गप्पा,आणि पुढील बेत सुरु.शनिवार रविवार स्कॉट लंड ला जायचं बेत ठरला.आरक्षण सुरु.तिकडे पण सर्व १२ मोठे आणि बच्चे कंपनी .

बाकी सर्व घरी गेले,अश्विनी अमोल अक्षरा थांबले होते.मी गरमगरम पोळ्या केल्या,नंदिनी ने भाजी केली.सर्वांनी ताव मारला.त्या विकतच्या पोळ्या खाऊन खरच ही मुळे कंटाळली आहेत,gas शेगडी नाही इकडे हॉट प्लेट वर थोड्या पोळ्या कडक होत आहेत,जमेल हळू हळू.तो पण एक अनुभव.

Tuesday, May 17, 2011

टेक ऑफ

विमानात सूचना सुरु झाल्या.इंग्लिश आणि हिंदी मध्ये त्यामुळे काही अडचण आली नाही.सुरवातीलाच किंगफिशरचे सर्वे सर्वाश्री.विजय मल्या यांनी स्वागत केले.म्हणजे रेकोर्ड टेप लावली होती.पण काही ही म्हणा प्रवाशांचे स्वागत तरी झकास झाले.नंतर थोड्याच वेळात आमच्या सर्व प्रवाशांची खातीर करायला खूप छान नम्र अशा वागणाऱ्या बोलणार्या हवाई सुंदरी येत होत्या. लाल रंगाचा सर्व पोशाख अगदी बूट सुद्धा.पण रुबाबदार!!काय दिले नाही? हाच प्रश्न आहे,अगदी विमांचे उड्डाण झाल्यापासून ते उतरेपर्यंत काही ना काही सतत सुरु होते.

जेवण,नाश्ता,कोल्ड्रिंक चहा,कॉफ्फी अगदी दारू पासून सर्व....या वेळी मी मस्त खात पीत प्रवास केला.घरी कधी बघत नाही पण विमानात दुसरे काहीच काम नव्हते.हातात मोबाईल नव्हता.त्यामुळे थ्री ईदियत ,यमला पगला दिवाना,ओम शांती ओम.हे ३ सिनेमे पहिले.रिमोट माझ्या हातात होता.कोणी बदलणार नवते.नंतर सुरेश वाडकर यांच्या बरसे बरसे अल्बम मधील सुरेल गाणी शांत पणे ऐकताना लंडन कधी आले समजलेच नाही.विमान उतरताना अनिकेत डोळ्या समोर दिसत होता,आता थोड्याच वेळात भेट होणार होती.

अबब!१किति मोठे विमानतळ ......उतरल्यावर इमेग्रेशन ला यायला अर्धा तास चालावे लागते.सर्व सरकते रस्ते,जिने यावरूनच बर का??मी आपली पर्स केबिन बेग घेऊन भराभर चालत होते.सुरवातीला जरा कमी रांग दिसली तिकडे उभी राहिले,अगदी इथे भारतीय उभे आहेत असे बघून....पण काय तिकडे चुकले.ती रांग यु के बोर्डर ची होती.परत दुसर्या भल्या मोठ्या रांगेत,मला तिरुपतीचीचआठवण झली.अरे बाप रे!!!! विमाने उतरली असतील असा विचार करत होते.३००/४०० माणसे अंदाजे रांगेत होती. ५०% भारतीय होते. रांग सरकत होती पुढे पुढे..

आता मोबाईल सुरु केला अनिकेत ला एके पोचले कळवले.त्याचा जीव भांड्यात पडला.रांगेत आहे काम झाले कि येते सांगून शांत उभी होते.अखेर आला नंबर....त्या युरोपियन माणसाने मी किती दिवस राहणार? कोणाकडे आले आहे?अनिकेत काय करतो?सर्व प्रश्न समजेल अशा इंग्लिश मध्ये विचारले.त्यामुळे मी पण त्याला अगदी ठामपणे उत्तरे दिली. मग परत चलते चलते सुरु....अखेर बेग पट्यावर दिसू लगली.बेग जास्ती नाही ३० किलो. बेग खाली उतरवून trolley ठेवणे कठीण गेले. पण काही इलाज नाही, उरापोटी केले. आता मात्र माझी एनर्जी संपत आली होती.पण बाहेर पडते तो काय समोरच अनिकेत उभा होता.नंदिनी आणि मंजिरी पण आली होती,खूप आनंद झाला.

अनिकेत कडे सर्व सामान देवून मी मोकळी झाले.taxi बुक केली होतीच, त्यामुळे लगेच गप्पा सुरु झाल्या.

माझ्या विमानात बोमेण इराणी हा नट होता हे मला बाहेर आल्यावर नंदिनी ने सांगितले. असो मला काही त्याचे फारसे वाटले नाही कारण आधी कळले असते अरी मी कुठे ओळखले असते त्याला?

संध्या काळी साडे सात ला बाहेर पडले होते, उजेड होता त्यामुळे लगेच लंडन दर्शन सुरु.मराठी तून आम्ही बोलत होतो,अखेर त्या taxi drivar ने कोणती भाषा?कोण आई आली आहे का विचारलेच.लगेच मंजू अश्विनी चा फोन आलाच.आयुष शी पण बोलले.मंजिरी ने तोंडात टाकायला आणले होते,ते टाकले लंडन चे पाणी प्यायले .एक तास प्रवास करून अनिकेत च्या घरी पोचले.वॉव काय सुंदर बाहेरचा परिसर ...येताना रस्त्यात गुलाबाचे रंगी बेरंगी ताटवे प्रत्येक घरासमोर दिसत होते.आपल्या सारखे कोणी फुले तोडून नेत नाहीत,हा अजून एक अनुभव.घरात आलो.

हे अनिकेतचे लंडन चे घर मला फारच आवडले.मस्त हवा. उजेड मोकळी जागा सगळीकडे कार्पेट,२ बेडरूम ,hall नवीन एल सी डी.डायनिंग रूम ,किचन सर्व काही प्रशस्त.आणि सुशोभित बघून मला खूप आनंद झाला.

नंदिनी ने गरमागरम चहा केला.त्यामुळे प्रवासाचा शीण गेला,गप्पा तर सुरु होत्या थोड्याच वेळात अश्विनी अक्षराला घेऊन आली.भाग्यश्री च्या लगनानंतर आज तिची भेट झाली.मला तिची त्या दिवसाची surprise भेट आठवली.लहानपणपासून शेजारी त्यामुळे घट्ट मिठी मारली.छोटीशी अश्विनी आता अक्षराची आई होती.अक्षरा ला जरा ओळख नाही त्यांनी रडू येत होते,पण अनिकेत मामा आणि नंदिनी मामी जवळ छान खिदळत होती.
 
जरा वेळ गप्पा मरून मंजिरी अश्विनी सह आम्ही सर्व जेवलो.तेव्हा आपले रात्रीचे २ वाजले होते,माझा दिवस संपतच नव्हता.अगदी निवांत icecream खाऊन tya त्या दोघी घरी गेल्या.त्या नंतर बेग उघडल्या खरेदी दाखवली.मग आपल्या पहाटे झोपलो.अश्विनी जवळ राहते त्या मुळे सकाळीच अमोल मला भेटायला आला.अक्षराला घेऊन.आता मात्र आजीची तिला जरा ओळख पटली होती,म्हणजे माझी.

छत्रे मेडम निघाल्या लंडनला !

११ मे बुधवार. आज सकाळ जरा लवकरच झाली.मला तर रात्री दुसर्या दिवशी जायचे या विचाराने झोपच लागली नाही.या वेळी सकाळचे विमान होते.त्यामुळे लगेच त्याच दिवशी अनिकेत नंदिनी भेटणार होते.याचा खूप आनंद होता.घरातील सर्व आवराआवर जमेल तेवढी केली.सुप्रिया ने [मैत्रीण]गरमागरम नाश्ता कांदे पोहे आणला होता.ती मला भेटून घरी गेली,कारण रोजची सवय झाली होती,आता लवकर भेट नाही म्हणून जरा हिरमुसली होती.मी सुशील नेहा भाग्यश्रीने पोटभर पोहे खाल्ले.

या वेळी माझा रुबाब काही और होता,लेकीने स्वतः नवीन गाडी आय टेन घेतली आहे,त्यामुळे ती मला विमान तळावर सोडायला स्वतः येणार होती.आहे कि नाही माझा थाट!!!आम्ही सकाळी ठीक ९ वाजता पोचलो.वाटेत नशिबाने रहदारी ने वेळ लागला नाही,सगळीकडे अगदी शुकशुकाट !काहीच लोक होते,नेहमी सारखी जत्रा नव्हती.गेट क्रं.७ वर आलो.किंग फिशर ने मी प्रवास करणार होते.लगेच त्यांच्या कंपनी ची माणसे आलीच विचारपूस करायला....य वेळी मला मदतनिसाची गरज तशी नव्हती.मी एकदाच अनिकेतकडे जाऊन आले होते,पण या वेळी म तयारीत होते.व निश्चिंत पण होते.तरी पण त्या सद गृहस्थाने मला मदत केली.मी आपणहून त्याला धन्यवाद दिले आपल्या भारतीय पद्धतीने ,समजले ना?

सर्व सोपस्कार संपवून मी आता आरामात गेट जवळ येवून बसले.म्हणजे २/२.३०तास तिकडे बसून वेळ घालवला.गेल्या वेळी बावळट सारखी नुसतीच बसले होते.पण या वेळी काय म्हणतात ते युज टु असल्या सारखे जरा सर्व दुकानातून फिरले.मग चक्क ७५ रुपये वाला चहा मागवला.मस्त चहा पीत वेळ घालवला.नंतर विमान बोर्डींगची सूचना सुरु झाली.पण आता सर्व माहित ना?त्या मुळे बिझनेस क्लास वाले आधी गेल्यावर शांतपणे रांगेत गेले.खूप वेळ होता,आपले खूप लोक पण रांगेत होते.चेकिग सर्व झाले.व मी परत विमानात पाय ठेवले.अनिकेत नंदिनी बरोबर तिरुपतीला विमानाने गेले होते,आता परत मी एकटीच होते.पण खरच सांगते सीट शोधताना खी अडचण नाही आली.कारण गेल्या वेळी समजले होते,आपल्या बस प्रमाणेच नंबर असतात.१९ब सीट होती.मग काय?बिनधास्त.

केबिन बेग या वेळी जवळ होती.कारण मोठ्या बेगेत आधीच सामान जास्त झाले होते.[वजन ३० किलो].कशी बशी केबिन बेग उचलून वर टाकली.[८ किलो]आणि आता मात्र खुर्चीत विसावले.......पहिले काम अनिकेत भाग्यश्रीला फोन केला.मला वर्हाड चाललंय लंडन ला.....त्याची आठवण झाली.मी मनाशीच हसले आणि म्हणाले,अखेर छत्रे मेडम निघाल्या लंडन ला.

खरच मागील आयुष्यात १५ वर्ष पूर्वी कधी असा विचार सुद्धा मनात आला नव्हता कि मी परदेश प्रवास करेन.पण खरच परमेश्वर फार ग्रेट आहे,त्याच्या मनात असेल तसेचसर्व घडते.गणपतीची माझ्यावर प्रचंड कृपा आहे हे नक्की!!!!!!!!!!!!!!!