Sunday, June 20, 2010

dharmik sahal

             श्री  स्वामी समर्थ !श्री स्वामी समर्थ!......
        कालच कल्याणी चा दहावी चा निकाल लागला.छान ९४ % मार्क मिळाले.खुश होते,तेव्हाच दर्शनाला जायचा योग आला.मग काय दुधात साखर.लगेच हो सांगितले.मी जयश्री[वाहिनी]आणि निवेदिता [भाची]आम्ही जायचे ठरले.नेहमी प्रमाणे रवि नि सर्व तयारी निशि गाड़ी पाठवली.आणि रोह्या[चालक ]बरोबर,काहीच कालजी नाही.
       सकाळी ७ ला जयश्री आली,तिने मला आणि भाग्यश्री ला काश्मीर हुन ड्रेस चे कापड आणले ते दिले.मजा सुरु!!!!!!!आम्ही दोघी पूना जायला निघालो.जाताना मस्त फ़ूड मोल  ला नाश्ता केला.प्रवासात सतत गप्पा सुरु होत्या.ते काश्मीर ला जाऊँन  आल्यापासून निवांत भेटलोच नव्हते.प्रथम पूना पोचलो.निवेदिता ने नंबर लावलाच होता.डॉ.ना भेटलो.ओके सांगितले,खुश.लगेच घरी गेलो,निवेदिता कड़े.मस्त जेवण तयार होते.भेटलो गप्पा मारल्या.जेवलो आणि सोलापुर ला जायला निघालो.पावसाने कृपा केली ,कुठे ही त्रास झाला नाही,म्हणजे पडलाच नाही.पुणे सोलापुर ६ तासाचा प्रवास,ओसाड रस्ता.अगदी सरळ.खायची काही सोय नाही.तसेच सोलापुर ला,पोचलो.
        सर्व होटल फुल...२ तास फिरलो,अखेर एका ठीक ठाक ठीका  नी राहिलो.फ्रेश झालो,जेवायला सावजी मधे गेलो.पोटभर जेवलो.अरिन ला घरीच जायचे होते,कसे तरी समजूत घालून झोपवले.ऐ सी  सुरु केला मी मात्र गारठले .
         सकाळी उठून आवरायला सुरवात केली,पण किती तरी वेळ चहा नाही की गरम पाणी नाही,ठंडा कारभार !!!!प्रवासाचे अनुभव सांगत गप्पा मारत कसे तरी आवरले,चहा घेतला.निघालो,होटल ध्रुव ला राम राम!
      बाहेर पडलो काल समोर एक कामत होटल पाहिले होते,पोटभर नाश्ता करून जायचे बेत केला.पण ते सोलापुर,साडे आठ ला होटल बंद.अखेर एका पॉश सिटी पार्क मधे गेलो नाश्ता केला आणि स्वामी दर्शनाला निघालो.३५ किलोमीटर प्रवास पण रस्ता ठीक नाही,पण पोचलो,दर्शन छान झाले,माझी पोथी वाचून झाली.यथा शक्ति आम्ही दानधर्म केला.आणि लगेच तुलजापुर ला जायला निघालो.अंतर ६५ किलोमीटर पण रस्ता अगदी ख़राब .श्री राज ठाकरे ना पात्र लिहिणार आहोत,महाराष्ट्राची देवी तुलजा भवानी तिकडे तरी सोय चांगली करा,
     दर्शनाला प्रचंड रांग.अखेर एका पुजारी ला ३५० रुपये प्रत्येकी दिले आणि मस्त सुखत दर्शन घेतले,साडी नेसवाली,ओटी भरली आरती पूजा छान केले.तिकडे मात्र अंगात आलेल्या बाई ला पाहून माझी घाबरगुंडी.....नमस्कार जेमतेम केला आणि बाहेर आले.काही ही जेवायची सोय धड नाही,तसेच सोलापुर ला आलो,वाटेत एका जंगली होटल मधे पोटाला आधार म्हणून जेवलो.झोपाले बघून अरिन मात्र खुश झाला.अखेर परतीच्या प्रवासाला लागलो.रस्ता अगदी सरळ कुठेही वलन नाही,६ तास प्रवास ट्रक ची खुप गर्दी लहान रस्ता,मजा होती सर्व.भिगवन ला एका ठिकाणी चहा घेतला,जरा पाय मोकले केले.पूना हडपसर आल्यावर जरा हायसे वाटले.अरिन तर खुपच खुश जाला कारण त्याला घरी जाऊँ खेलायाचे होते,निवेदिता कड़े पोचलो.फ्रेश झालो.लगेच पुणे मुंबई प्रवास सुरु.तिच्या सासुबाई नि मस्त टेस्टी मुगाची धिरडी करून दिली होती.मी जयश्री आणि रोह्यानी गाडीत खाल्ली.दत्त ला चहा घेतला.रात्रि साडे बारा ला मी घरी पोचले.जयश्री त्या नंतर कल्याण ला एक तासाने पोचली,
                     स्वामी समर्थ आणि तुलजा भवानी देवी चे प्रसन्न दर्शन घेउन आम्ही सुखरूप आलो.
-------------------------------------------------०००००-------------------------------------------------------------------------

Friday, April 16, 2010

                             लाल बाग़ परल नविन चित्रपट.
                 गिरण गावावर आधारित नविन चित्रपट रविवारी पाहिला.खुप गोष्टी पटल्या नाहीत.त्या वेळी जे गिरणी कामगार होते त्यांचे विदारक चित्र  मांडले आहे,हे नक्की.पण सर्व कामगार काही दारू पीत आयुष्य घालवत नव्हते.काही घरातील स्त्रिया कामे करून मोल मजूरी करून संसार रथ चालवत होत्या.मुले नकळत समंजस झाली होती. काही नोकरदार लोकानी मिळेल ते काम करून ,नविन काही शिकून आपले कर्तव्य पार पाडले आहे.कुठच एकदाही या चित्रपटात सकारात्मक दाखवले नाही असे जाणवले. मुली बायका वाम मार्गाला सगल्या काही लागल्या नाहीत.मारामार्या आणि गोलीबार जास्त प्रकर्षाने दाखवले आहे.
               मालकाने जमीनी विकून तिकडे  शोपिंग सेंटर सुरु केले.हे सत्य आहे.कामगाराना काहीही फायदा झाला नाही.सरकार ने काहीही केले नाही.हे का दाखवले नाही??????????पक्ष आले गेले,सत्ता आली त्यानी काहीही केले नाही.यातून नक्की काय दाखवले??????/
            श्री.महेश मांज्रेकर यांच्या कडून खुप वेगळ्या अपेक्षा होत्या.
        

Friday, January 8, 2010


 किती सांगू मी सांगू कुणाला???
                           आज आनंदी आनद झाला!!!!!!!!!!!!
         आजकाल प्रत्येक आई वडिलांना वाटत असते,आपल्या मुलाने प्रत्येक क्षेत्रात नाव कमवावे.शिक्षण तर हवेच.शालेय शिक्षणातच स्पर्धा सुरु होते.भारतात आपल्याकडे अजून तरी शालान्त परीक्षा माघ्त्वाची समजली जाते.त्याच्या गुणावरच पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेणे शक्य होते.चांगले कॉलेज मिळावे यासाठी चांगले गुण आवश्यक आहेत.याची जाणीव पालकांना आणि मुलांना झाली आहे.हे भाग्याचे आहे.त्यासाठी दहावीला इतर सर्व उद्घ्योग बंद करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले जाते.एकदा का चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळाला कि मुलांच्या प्रगतीला खरी सुरवात होते.मुलगा असो वा मुलगी.आपल्याला नेमके कोणते शिक्षण घेऊन नोकरी,व्यवसाय करायचा आहे ते ठरवण्या इतके सक्षम होतात.पदवी हाती आली कि काही जण नोकरी करतात तर काही उच्य शिक्षण घेतात.त्यासाठी त्यांना परदेशी जावे लागते.परदेशात शिक्षणासाठी पाठवायला पालकाची मानसिक तयारी असते.शिक्षणासाठी खर्च खूप येतो पण तेही करतात आनदाने.आजकाल शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज पण मिळते.त्यामुळे शिक्षण घेणे सोपे होते.
          परदेशात मुले शिक्षणासाठी राहू लागली कि सुरवातीला त्यांना जरा जड जाते पण काही दिवसात तेथे छान रुळतात.त्यांना तिकडचे तेच खरे आपले जीवन वाटू लागते.आपल्या पेक्षा तेथील रोजचे जीवन नक्कीच सुखकर आहे.दगदग त्रास नसतो,हवा शुद्ध.प्रदूषण नाही.आवाज,गोंगाट नाही.आणि छान सुसज्ज घरे आलिशान गाडी सर्वे सुखसोयी तशा सहज मिळतात.त्यामुळे आपण घर सोडून बाहेर राहतो याचे काही फारसे वाटत नाही.संगणक फोन याने सतत संपर्क तर राहतो.मला वाटते मुले परदेशात असताना अधिक सुसंवाद होतो.शिक्षण घेताना परदेशात नोकरी पण मिळते त्यामुळे आर्थिक स्वतंत्रता मिळते.एकटे राहू लागले कि जवाबदारी येते.घरची पैशाची किंमत कळू लागते,शिक्षणासाठी केलेला खर्च परत मिलावनेसाठी परदेशात नोकरी करणे फायदेशीर ठरते.सुखद जीवन जगून काही रक्कम तरी शिल्लक राहते.एकदा हे गणित मुलांना जमले कि ती नक्कीच तसे वागू लागतात.
       आपल्या कडे नोकरी करताना प्रवासाचा त्रास होतो त्याने अर्धे आयुष्य कमी होते.त्यामानाने रोजचा खर्च आणि पगार याचे गणित जुळत नाही.सामान्य वर्ग तर त्याने बेजार होतो.आयकर वाचवणे साठी पण पैसे बाजूला टाकणे कठीण जाते,अशा वेळी परदेशात नोकरी करणारे सुखद निश्चिंत जीवन जगत असतात.आपल्या घराला सुस्थिती यायला तेच दावेदार असतात.हे मी अनुभवाने सांगते.आपल्या आणि परदेशी चलनात असणारी तफावत मुलांना डॉलर पौंड युरो मध्ये मिळणारा पगार ,यामुळे त्यांचे राहणीमान खूप बदलते.सुसज्ज घर,गाडी,दागदागिने  सर्वे हौस मौज ते करू शकतात.भारतात नोकरी करणाऱ्या मुलांना मर्यादा येतात.सरळ मार्गाने भरारी झेप सहज घेऊ शकत नाही.माझा अनुभव बघा ना.........
अनिकेतला परदेशात जाण्याची संधी मिळाली म्हणून तो मला नोकरी सोड,निवृत्ती घे सांगू शकला,तसेच घरासाठी लागणारा पैसा एकही रुपयाचे कर्ज न घेता देवू शकला,भाग्यश्री चे लग्न थाटात केले,आणि आता माझा परदेश दौरा ,स्वप्न नगरीची सफर या गोष्टी परदेशात राहिल्याने झाल्या हे नक्कीच!!!!!!!!!!!!
       आपण आपल्या विचाराच्या चौकटीतून बाहेर पडलो तरच मुलाचे व्यक्तिमत्व चांगले घडू शकते.घरची परिस्थिती चटकन बदलते.स्थिरता लवकर येते.पण हे सर्व होण्यासाठी मुलांकडे सकारात्मक नजरेतून पहिले पाहिले पाहिजे.त्यांना आपण मानसिक पाठींबा तरी नक्की देऊ शकतो.घरातील एकाची प्रगती झाली कि इतर अनुकरण करतात,कुटुंब प्रगती करते.त्याने देशाची प्रगती पण होते.
                                                                                                                                                                                                  मयुरा छत्रे.
-----------------------------------------------------०------------------------------------------०००

सांगू कशी ग मनाची व्यथा मी?????????????
                               परदेशात गेल्यावर मुले आपली राहत नाहीत हि प्रत्येक भारतीय माता पित्याची खंत असते.खरे आहे.इकडे परदेशात त्यांना सुखकर जीवन,पैसा आणि स्वतंत्रता मुबलक मिळते.त्यांना माणसांची गरज वाटत नाही.वाटते तेव्हा त्यांच्या सारखेच आलेले मित्र चार घटका वेळ घालवायला असतात.हे सर्वे ठीक आहे,पण त्यात प्रेम,आपुलकी,किती असते?काही जणाशी आपली चांगली मैत्री होते.आपले विचार जुळतात,पण इतर अगदी तेवढ्या पुरते फक्त एक सोपस्कार,भेटणे,बोलणे,खाणे पिणे.हाय हेल्लो पुरते.
                              अशा या दुनियेतील मुलांना मागचे दिवस आठवत नाहीत का??आठवत असतील नक्कीच.पण त्यांना आता पाठी फिरून बघायचे नसते.तसे त्यांनी मनाशी पक्के ठरवलेले असते.मुले विचार करतात,आई वडिलांना गरजेपुरते पैसे पाठवले कि झाले.आपली जवाबदारी कर्तव्य आपण केले,पण तसे होते का?का यात फक्त व्यवहार उरतो.दुसरे ते काही करू पण शकत नाहीत.वर्षातून एकदा वीस दिवस सुट्टी मिळते त्यांना.तेव्हा ते स्वदेशात तरी येतात,किवा आई वडिलांना बोलावतात.किवा बायको मुलांना घेऊन दुसर्या देशात फिरायला जातात.तसे करणे योग्य आहे,कारण वर्ष भर नोकरी ,घर,यात अगदी पार गुरफटून गेलेले असतात.
                            प्रत्येक आई वडिलांना विशेषतः आईला आपले मुल लहान वाटत असते.पण परदेशात मुले जेव्हा स्वतंत्र पणे आपले घरकुल मांडून राहू  लागतात.तेव्हा ती अकाली प्रौढ समंजस होतात,नव्हे त्यांना तसे व्हायला लागते.कारण प्रत्येक जवाबदारी त्यांच्यावर आलेली असते.कामाच्या बद्घल बोलायचे झाले तर,नोकरी टिकवणे त्यांच्या पुढील आव्हान असते.ते आव्हान पेलताना त्यांना खूप कष्ट करावे लागतात.पण पैसा थोडा जास्त मिळतो,म्हणून ते करायची मानसिकता होते.आणि घराच्या बाबतीत सांगायचे तर बायको आणि मुले यांच्या गरजा पूर्ण करणे हे त्यांचे ध्येय होते.आणि अशा या कात्रीत सापडलेली मुले अकाली प्रौढ होतात.
                            कुठे तरी वेळ घालवून आपले मन रमवणे सुरु होते.अशा वेळी त्यांच्या हातातील खेळणे म्हणजे संगणक .तो तर त्यांच्या जीवनातील एक घटक बनतो.सतत त्यावर काहीतरी शोधत राहणे,ते मनोरंजनाचे उत्तम साधन आहे नक्की.पण त्यातून स्वतःची आवड किती राहते????वेळ घालवण्या साठी हि मुले कोणतेही चित्रपट पाहतात.,खेळ खेळतात,मित्रांशी कोरड्या गप्पा मारतात.एका जागी बसून ,संगणक आणि ते हेच त्यांचे विश्व बनते.काही दिवसांनी पाठ दुखू लागते,डोळे दगा देतात,बोटे पण दुखतात.पण अशा वेळी घाटी काही पर्याय नसतो.ते संगणकाच्या आधीन झालेले असतात.व्यसनच ते एक,प्रकार वेगळा.
                         फिटनेस साठी जिम ला जातात.पण ते काही जास्त वेळा जास्त दिवस जायला जमत नाही.त्यामुळे परत आपला संगणक आणि ते चिकटून बसतात.
                         परदेशात हवा चांगली,वाहतुकीची सोय छान,वीज ,पाणी याची काळजी नाही,सर्वे काही तयार वस्तू छान मिळतात.यात शंका नाही.पण त्याच गोष्टी साठी आपली मुले किती पैसा मोजतात ते अनुभवल्या शिवाय समजत नाही.पैसा खर्च करणे गैर नाही,पण पगार आणि खर्च याचा ताळमेळ जुळवताना त्रेधा तीर्पित  उडते ,असे होता कामा नये असे वाटते.नाहीतर आपली म्हण आहे ना...'तेल गेले,तूप गेले,हाती राहिले धुपाटणे!!!!!!!!!!!!!!!!!'
      

एक कथा.........
                       एका मध्यम वर्गीय महिलेची कथा तिच्याच शब्दात.....आज मी सकालीच उठुन काहितरी वेगले करावे असा विचार केला.काय करावे?चाकोरी बाहेरचे काही तर मला करता येणार नव्हते.कारण मी पड्ले मध्यम वर्गीय महिला.तेव्हा जे सर्वे करतात तेच आपण केले पाहिजे....समाजाविरुद्ध जाऊन चालणार नव्हते.बदल हवा वाटणे ,अगदी सहज प्रवृत्ती.पण तो बदल पण पटकन स्विकारता येत नव्हता.पण अखेर एक दिवस मी स्वभावाच्या थोडे वेगळे वागायला सुरवात केली.अर्थात घरातल्याना ,मुलांना ते पटणारे नव्हते.पण एका क्षणी मी पक्का मनाशी विचार केला ,कि मी आता फक्त माझ्यासाठी  जगणार......विचार चांगला पण आमलात आणणे कठीण जात होते.वागायला सुरवात तर केली.झाला तर माझा फायदा च होणार होता.नुकसान नक्की नाही.
                      एक दिवस एक वेळ अशी आली कि मला आपण एकटे आहोत याचे वाईट वाटू लागले.आपल्या मनातील सुख दुख सांगावीशी वाटू लागली.पण कोणाला सांगणार?मुले आपल्या संसारात रमली आहेत.त्यांना सांगून काही फायदा नाही,आणि त्यांच्या संसारात आपण विरजण  घालायचे नाही ,मनाशी पक्का निर्धार केला कि यापुढे आपले दुख अडचणी त्यांना सांगायच्या नाहीत.आणि तसे वागायला सुरवात पण केली.या गोष्टीचा सुरवातीला मला त्रास होऊ लागला.कारण त्या मुळे बोलायला काही विषयच राहत नसे.यातून मला एकटीला गप्प बसून राहायची सवय लागली.समाजप्रिय मी पण आता सरावाशी बोलणे मला जमत नव्हते.सतत मनाशी बोलणे विचार करणे सुरु झाले.यातून एक नको ती उपाधी माझ्या मागे लागली.ती म्हणजे डिप्रेशन ....याचा त्रास पण अनुभवला.जाणीव झाली यातून बाहेर पडायला हवे.झोप न लागणे ,रडू येणे,जेवण नकोसे वाटणे हे सर्वे सुरु झाले.आणि तरी वजन मात्र वाढू लागले.तेव्हा डॉक्टरना गाठले.माहित होते कि ते औषधे देणार ,त्याने झोप लागेल मनाला उत्साह वाटेल.झाले तसेच जोवर औषधे सुरु होतितो पर्यंत ठीक होते.पण परत ये रे माझ्या मागल्या!सव त्रास परत सुरु झाला.मला औषधाच्या आहारी जायचे नव्हते म्हणून थोडा त्रास मी सहन पण केला.औषधे घेतली नाहीत.पण काहीच दिवसांनी मला खूप बेचैन वाटू लागले.थकवा तर कमालीचा आलांनी रडणे तर आवरू शकत नव्हते.अखेर औषधांना शरण आले आणि परत घेणे सुरु केले.२/३ दिवस घेतल्यावर फरक पडला.मनात हाच विचार आला कि आपण असेच सतत औषधावर अवलंबून राहायचे का?पण खरच असे काही जीवनात क्षण असतात कि ते आपल्याला बेचैन करतात,कसे वागावे?काय बोलावे सुचतच नाही.समोरचे आपल्या  बद्धल काय विचार करत असतील?हा विचार करून पण मन अगदी थकून जाते....अखेर आपण आपल्या हाती काही नसल्याचे मान्य करतो.परमेश्वराचे नाव घेतो,पण मन रामातेच असे नाही.तर तो एक उपाय असतो...........!
                                           संगणक एक खजिना
                  आपण आता ज्या काळात वावरतो त्या काळात प्रत्येकाला संगणकाची माहिती असणे
 जरुरीचे झाले आहे.एकदा का आपण त्याचा वापर करू लागलो की आपल्याला त्यातील आणखी आणखी खूबी समजू लागतात.आता तर प्रत्येक कार्यालयात सर्व कामे संगणकावर करतात.इंग्लिश,हिंदी मराठी सर्व भाषा चा वापर केला जातो.पूर्वी सर्व कामे कागद पेनाशी निगडित होती.आता सर्व सोपे झाले आहे.सर्व माहिती पोटात साठवून ठेवणारा हा संगणक आहे,गाई च्या पोटात ३३ कोटि देव आहेत ही पुराण कथा संगणक पाहून त्यातील माहिती पाहून खरी वाटते.आता कार्यालयात फायली रजिस्टरकागदाचे गठ्ठे दिसत नाहीत.पसारा नाही,जागा कमी लागते.आणि मह्तावाचे म्हणजे वालवी[कसर]लागुन दस्तेइवज नष्ट पण होत नाही.संगणकावर जतन केलेली माहिती आपण कुठेही आपल्याला उपलब्ध होते.हा विशेष सोयीचा फायदा मला वाटला.नाहीतर पूर्वी फायालिचे बाढ़ [ओझे ]घेउन जावे लागत असे.सरकारी कामे तर कठिन.इंटरनेट तर आगदी अन्न वस्त्र निवारा या मुलभुत गरजा इतके महत्वाचे झाले आहे. आपण जगातील कोणत्याही कोपर्यात असलेल्या लोकांशी सहज संपर्कात रहू शकतो. मेल ऑनलाइन बोलणे  [चाट]यामूले आपले विचार मनोगत सहज सांगू शकतो.आपला माहितीचा खजिना पण खुप वाढतो.प्रत्येक बारीक़ सरिक गोष्टीची माहिती यच्ययावत मिलते .टी पण चुटकी सरशी ....गम्मत आहे की नाही!!!!!!!!!!!!!घरगुती,सामाजिक,राजकीय  कोणत्याही क्षेत्रातील असो.
                       पूर्वी नाव गाव फल फूल असा एक लहानपणी खेळ सामान्य माहिती वाढावी म्हणून एक खेळ खेलला जात असे,त्या एइवेजी आजकाल मुलेच असे नाही तर कोणीही संगणकावर एखाद्या अक्षर पासून मिलानारी विविध माहिती मिलवू सहज शकतो.मला तर वाटते ते एक शिक्षणाचे द्रुक श्राव्य माध्यम आहे..त्याचे फायदे खुप आहेत तसे तोते पण जाणवले.विशेषतः कुमार वयातील मुले याचा उपयोग कसा करतात हे कालजी पूर्वक पाहिले पाहिजे.मुलाना प्रोजेक्ट साठी खुप माहिती इनटर्नेट ने मिलते हे मान्य आहे त्याचा जरुर उपयोग केला पाहिजे,पण इतर जे वीडियो असतात जे नको टी माहिती सहज देतात .याने त्या मुलांची मानसिकता बिघडू शकते.त्याचा प्रत्यक्ष जीवनात नकळत वापर करतात.  अगदी बाल वयातील मुले संगणक सहज हतालतात.कौतुक वाटते नक्कीच.पण गेम चे त्याना इतके वेड लागते की त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.सतत तासनतास बसून गेम खेळत बसतात त्याने त्यांची शारीरिक वाढ पण खुंटते.डोळे बिघड्तात,लहान वयात चश्मा लागतो ते वेगलेच..कॉलेजातील मुले चाटिंग मुले अनोलखी लोकांशी संपर्कात सहज येतात.नकळत आपली माहिती त्याना देतात ,त्यामुले सामाजिक अडचणी    पण निर्माण होतात.फोटोज पाठवने अगदी
 सहज सोपे झाले आहे.चांगले आहे नक्की,पण काही वेळा याचा गैर वापर कुमार वयातील मुले करतात.तरुण मुली नको त्या लोकांच्या संपर्कात येतात.स्वतंत्रता आहे त्याचा वापर काही मुले चुकीने वाईट संगतीने करतात.वीडियो मित्र मैत्रिनिना दाखवतात.परिणामी शिक्षण कमी वाम मार्गाला अधिक लागतात.जय ठिकाणी पालकांचे  लक्ष नसते तेथे या गोष्टी जास्त घडतात.पूर्वी टी.व्ही ला इदिओत बॉक्स म्हटले जायचे?????????आता संगणकाला काय म्हणतील???ते वेळ येवू नये या साठी त्याचा सुयोग्य वापर करणे  गरज आहे..
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------                                                               

Sunday, January 3, 2010

back to india

           परतीची तयारी सुरु झाली.खरेदी केली खुप,सामान जास्त .बैग भरने कसरत होती.पण अनिकेत अगदी तरबेज .नंदिनी ने सर्व भेट वस्तु वर नावे घालून दिली.ते दोघे सामान भरत  होती,मी शांत बसले होते.थोड़े सामान काढून ठेवावे लागले.माझे घरात घालायचे कपडे ठेवून आले,परत समर मधे जायचे आहे.
           अनिकेत,नंदिनी करता थोड़े खाद्य पदार्थ करून ठेवले.आधीचे दोन दिवस बाहेर खुप फिरलो.दुसर्या दिवशी सकाळी निघायचे होते,रात्रि झोप नाही लागली.आता लवकर ही दोघे भेटणार नाहीत,
             शिपोल विमान तलावर पोचले.तिकडे टिकिट घेताना बैग जमा करताना दोघे बरोबर होतीच.खुपच नियमाने वागनारे लोक आहेत जाणवले.सामान कमी करावे लागले म्हणून जरा त्या लोकांचा मला राग आला होता.हौशीने घेतलेले काढावे लागले.परदेशात आपले काही चालत नाही,तिकडे काही इतर मार्ग पण नाहीत.अखेर मी दोघांचा निरोप घेउन निघाले.समोरच चोकलेट चे दुकान होते.अनिकेत ने मला दिलेले सर्व युरोची मी चोकलेट घेतली.बेधड़क ही पहिलीच खरेदी मी केली.चालत गेट वर पोचले.तिकडे चक्क १५/२० भारतीय लोक बघून मी अवाक् झाले.अरे!मला ३ महिन्यात ही मानसे कुठेच दिसली नाहीत.सिक्यूरिटी चेकिंग करून निवांत बसले.अनिकेत नंदिनी ला आधी फ़ोन केला,ते दोघे बाहेर वाट बघत होती.
          विमानात अगदी शांत पणे येवून बसले.एका ट्रीप ने मला किती आत्मविश्वास आला होता.येताना स्वस्थ बसलेली मी यावेळी कोणाची मदत न घेता सेट झाले,चक्क २ चित्रपट पाहिले.मधून मधून विमानाचा मार्ग अंतर ठिकाने नकाशात पाहत होते.आपण एम्स्तेर्दाम ते मुंबई अंतर ६८५४ किलोमीटर ४२५४ मिनिटात पार करणार आहोत याची नोंद पण करत होते.बाहेरचे सतत कमी आधिक होणारे तापमान पण बघत होते.विमानाचा दिवसाचा प्रवास होता.खाणे पिणे चांगले होते.शेजारी ग्रीन कार्ड होल्डर मद्रासी बाई होती,जरा बोलत पण होते.शेवटचे २ तास राहिले आता मात्र मला घरचे वेध लागु लागले.जाताना पेक्षा येताना प्रवास सुखद झाला.फॉर्म भरून ठेवले.चक्क २० मिनिटे लवकरच विमान उतरले....हुश्य!!!!!!!!!!आले परत....बाहेर येताना आठवणी मनात घोळत होत्या.भल्या मोठ्या रांगेत उभी राहिले,नंबर आला आणि त्यानी दूसरा फॉर्म दिला.परत पासपोर्ट चश्मा काढून फॉर्म भरला.हा फॉर्म तेवाच दिला असता तर......पण काय आपली इंडिया.लोकाना त्रास कसा होइल याचाच आधिक विचार करतात की काय?अखेर सर्व  सोपस्कार आवरून मी एक तासानी बाहेर पडले,अनिकेत चा फ़ोन आलाच.सर्व माझी वाट पाहत होते सामान सुशिल ने घेतले.सर्वाना भेटून मी घरी यायला निघाले.सौरभ खुपच बारीक़ झाला आहे.जिम जोरात आहे.
             घरी येताना फरक जाणवत होता.कर्कश होर्न आमच्याच गाडीचा होता.पण बोलून काही उपयोग नव्हता.
        घरी आले फ्रेश झाले.देवाला नमस्कार केला,ट्रीप छान झाली देवाचे आभार मानले.चहा घेत गप्पा सरू.भाग्यश्री ने खरेदी बघितली.दोघी पोरी खुश झाल्या.[कल्याणी आणि भाग्यश्री]जरा वेळ विश्रांति घेतली.सकाळ पासून माझे काम सुरु झाले.
           असा झाला माझा पाहिला प्रवास.आता परत समर मधे जाणार आहे,तेव्हा परत लिहीनच.पण आता इथेच राम राम!!!!!!!!!!!!!!!!!
 ----------------------------------.-----------------------०------------------------------------०----------------