Sunday, June 20, 2010

dharmik sahal

             श्री  स्वामी समर्थ !श्री स्वामी समर्थ!......
        कालच कल्याणी चा दहावी चा निकाल लागला.छान ९४ % मार्क मिळाले.खुश होते,तेव्हाच दर्शनाला जायचा योग आला.मग काय दुधात साखर.लगेच हो सांगितले.मी जयश्री[वाहिनी]आणि निवेदिता [भाची]आम्ही जायचे ठरले.नेहमी प्रमाणे रवि नि सर्व तयारी निशि गाड़ी पाठवली.आणि रोह्या[चालक ]बरोबर,काहीच कालजी नाही.
       सकाळी ७ ला जयश्री आली,तिने मला आणि भाग्यश्री ला काश्मीर हुन ड्रेस चे कापड आणले ते दिले.मजा सुरु!!!!!!!आम्ही दोघी पूना जायला निघालो.जाताना मस्त फ़ूड मोल  ला नाश्ता केला.प्रवासात सतत गप्पा सुरु होत्या.ते काश्मीर ला जाऊँन  आल्यापासून निवांत भेटलोच नव्हते.प्रथम पूना पोचलो.निवेदिता ने नंबर लावलाच होता.डॉ.ना भेटलो.ओके सांगितले,खुश.लगेच घरी गेलो,निवेदिता कड़े.मस्त जेवण तयार होते.भेटलो गप्पा मारल्या.जेवलो आणि सोलापुर ला जायला निघालो.पावसाने कृपा केली ,कुठे ही त्रास झाला नाही,म्हणजे पडलाच नाही.पुणे सोलापुर ६ तासाचा प्रवास,ओसाड रस्ता.अगदी सरळ.खायची काही सोय नाही.तसेच सोलापुर ला,पोचलो.
        सर्व होटल फुल...२ तास फिरलो,अखेर एका ठीक ठाक ठीका  नी राहिलो.फ्रेश झालो,जेवायला सावजी मधे गेलो.पोटभर जेवलो.अरिन ला घरीच जायचे होते,कसे तरी समजूत घालून झोपवले.ऐ सी  सुरु केला मी मात्र गारठले .
         सकाळी उठून आवरायला सुरवात केली,पण किती तरी वेळ चहा नाही की गरम पाणी नाही,ठंडा कारभार !!!!प्रवासाचे अनुभव सांगत गप्पा मारत कसे तरी आवरले,चहा घेतला.निघालो,होटल ध्रुव ला राम राम!
      बाहेर पडलो काल समोर एक कामत होटल पाहिले होते,पोटभर नाश्ता करून जायचे बेत केला.पण ते सोलापुर,साडे आठ ला होटल बंद.अखेर एका पॉश सिटी पार्क मधे गेलो नाश्ता केला आणि स्वामी दर्शनाला निघालो.३५ किलोमीटर प्रवास पण रस्ता ठीक नाही,पण पोचलो,दर्शन छान झाले,माझी पोथी वाचून झाली.यथा शक्ति आम्ही दानधर्म केला.आणि लगेच तुलजापुर ला जायला निघालो.अंतर ६५ किलोमीटर पण रस्ता अगदी ख़राब .श्री राज ठाकरे ना पात्र लिहिणार आहोत,महाराष्ट्राची देवी तुलजा भवानी तिकडे तरी सोय चांगली करा,
     दर्शनाला प्रचंड रांग.अखेर एका पुजारी ला ३५० रुपये प्रत्येकी दिले आणि मस्त सुखत दर्शन घेतले,साडी नेसवाली,ओटी भरली आरती पूजा छान केले.तिकडे मात्र अंगात आलेल्या बाई ला पाहून माझी घाबरगुंडी.....नमस्कार जेमतेम केला आणि बाहेर आले.काही ही जेवायची सोय धड नाही,तसेच सोलापुर ला आलो,वाटेत एका जंगली होटल मधे पोटाला आधार म्हणून जेवलो.झोपाले बघून अरिन मात्र खुश झाला.अखेर परतीच्या प्रवासाला लागलो.रस्ता अगदी सरळ कुठेही वलन नाही,६ तास प्रवास ट्रक ची खुप गर्दी लहान रस्ता,मजा होती सर्व.भिगवन ला एका ठिकाणी चहा घेतला,जरा पाय मोकले केले.पूना हडपसर आल्यावर जरा हायसे वाटले.अरिन तर खुपच खुश जाला कारण त्याला घरी जाऊँ खेलायाचे होते,निवेदिता कड़े पोचलो.फ्रेश झालो.लगेच पुणे मुंबई प्रवास सुरु.तिच्या सासुबाई नि मस्त टेस्टी मुगाची धिरडी करून दिली होती.मी जयश्री आणि रोह्यानी गाडीत खाल्ली.दत्त ला चहा घेतला.रात्रि साडे बारा ला मी घरी पोचले.जयश्री त्या नंतर कल्याण ला एक तासाने पोचली,
                     स्वामी समर्थ आणि तुलजा भवानी देवी चे प्रसन्न दर्शन घेउन आम्ही सुखरूप आलो.
-------------------------------------------------०००००-------------------------------------------------------------------------