Tuesday, November 24, 2009

pardesh gaman anjbhav

                                             परदेश गमनाचे वारे वाहू लागले आणि तयारी ला जोर आला.वीसा घरी आल्यावर मात्र हातपाय भरभर हलू लागले.बघता बघता मी पहिला विमान प्रवास करून अनिकेत कड़े आले.८ सप्टेम्बर ला.तेव्हा पासून चे माझे अनुभव मी ब्लॉग मधे लिहायचा प्रयत्न केला आहे.पूर्वी मला परदेशात येण्यात काही स्वारस्य वाटत नव्हते,इतरासरखे आकर्षण पण नव्हते.पण एकदा मनाची तयारी करून अनिकेत कड़े आले.फक्त ३ महीने वास्तव्य आहे ठीक आहे,जातील दिवस पटकन.असे वाटले,आणि सुरवातीला तसे झालेही.नव्याची नवलाई होती,नविन शहर कसे आहे याची माहिती करून घेत होते,खुप वर्षानी मी आणि अनिकेत गप्पा मारत फिरलो,तेव्हा काय वाटले कसे सांगू???अनिकेत मधे खुप चांगला बदल झाला आहे असे जाणवले.लगेच एक महिन्याच्या आत त्याने मला स्वप्न नगरिची सफर घडवली.तेव्हा तर काय मला खुपच आनंद झाला होता.मनात खुप वेळा२ विचार सतत यायचे,अशा या रम्य ठिकाणी आपण एकटेच आलो आहोत,मला ह्यांची उणीव खुप वेळा होत असे.पण काय करणार??आपले नशीब.आपले दुख आपल्याशी ठेवायचे त्याचे भांडवल करायचे नाही हे मनाशी पक्के केलेले आहे.त्यामुले कुणाला जाणीव करून देत नसे.आणि दूसरा विचार ती दोघेच इकडे आली असती तर ,त्यानी आणखी मजा केलि असती,माझ्या मुले त्याना स्वतंत्रता मिळत नाही असे सारखे वाटत होते.पण इतर अनोल्खी लोकान पेक्षा मी मुलासुने बरोबर आले याचा आनंद आधिक होता.
                                  परदेश वास्तव्याचे ३ टप्पे केले तर माझा पहिला महिना पटकन निघून गेला.सतत फिरने गप्पा सुरु होत्या.पण दुसर्या महिन्यात मला घर दिसू लागले.कधीच मी बाहेर इतके दिवस राहिले नाही.त्यानी माझे मन कशातच रमत नव्हते.इकडे ठंडी ची लाट ही तेव्हाच आली.आता ही थंडी कशी सोसणार?घरी बसून वेळ कसा घालवायचा?????या विचाराने मन खुप वेळा उदास होत असे.ही दोघे मला उपाय सांगत असत ,पण मला ते काही पचनी पडत नव्हते.अखेर मी परत यावे या विचाराला आले.तसे अनिकेत भाग्यश्री जवळ बोलले पण.हा माझा विचार काही पट्नारा नव्हता.पण मला खरच काय करावे सुचत नव्हते.अस्वस्थ मनाने रहाणे काही अर्थ नव्हता.भाग्यश्री ने टिकिताची चौकशी केलि.मनात चलबिचल सुरु झाली.पण अखेर या वेळी मला माझ्या गणपतिने [देवाने]सद्विचार दिला.आणि मी लवकर परत न जाता थोड़े दिवस आहेत ते आनंदाने रहायचे हा विचार पक्का केला.विचार करने ,बेत आखाने सोपे असते पण कृतित आनने कठिन जाते.पण तेहि केले.
                                   परत घरी जाताना ची खरेदी मी आणि नंदिनी ने एका दिवशी उरकून टाकली.तेव्हा सामानाचे वजन जास्त होइल हा विचारही दोघिनी केला नाही.पण आता माझे कपडे ठेवून जायचे या विचाराला मी पोचले ,हे ही नसे थोडके!!!
                                    परदेश पहिल्या शिवाय आवडत नाही हे मी अनुभवाने सांगते.मला इकडे शुद्ध हवा,मुबलक पानी,विज ,नयन रम्य निसर्ग सौन्दर्य ,सर्वे सुखसोयी आहेत.फुटपाथ ,रहदारी कमी,जाने येणे प्रवास सुखकर.हे सर्वे अवड्त असे.चालायला फिरायला आवडत असे.बाजारात जाऊ लागले,मनात तुलना करत असे,पण तरी रोजचे जीवन चांगले आहे .हे नक्की.पण   ..........खर सांगू का????????
                      बहु असोत संपन्न की महा ,प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
                                              परदेशात राहणारी मुले आधिक वेळ घरी रहातात,आपल्या सारखा नाका नसतो,आणि खुप खास मित्र पण नसतात.चक्क माझा वेळ जावा म्हणून आम्ही कितीतरी वेळा पत्ते खेलत असो.अनिकेत च्या आवडीचे पदार्थ करण्यात मी पुढाकार घेत असे,माझे पोथी वाचन पूर्ण झाले,त्याचे मेहुंन पण जेवू घातले,परदेशात मला चक्क घारपुरे जोडपे भेटले,[अनिकेत चा मित्र]पूरण पोली चे जेवण केले,रुपयात नाही ,यूरो मधे दक्षिणा पण दिली.सुधारक देशातील ते मेहुंन वेस्टर्न कपडे घातलेले.बुट घालून टेबल वर जेवायला बसले.पण इकडे ठीक आहे.आपण आपले विचार,संस्कार बाजूला ठेवून वागलो तर पुढच्या पीढ़ी बरोबर दिवस चांगले जातात हा विचार केला.शांत राहिले,आपल्या मुलांवर संस्कार असतात,पण परदेशात गेल्यावर त्याचे काय होते ,देव जाणे....
        कालाय तस्मै नम्हा!!!!!!!!!!!!
              आता माझे घरी जायचे दिवस जवळ आले,एकच आठवडा राहिला.आता मात्र माझी स्व देशातील लोकाना भेटण्याची ओढ़ वाढू लागली,पण त्याच वेळी आता अनिकेत नंदिनी दोघे लवकर भेटणार नाहीत,असे सारखे मनात येवू लागले.मग मी मे मधे आंबे खायला तुम्ही तिकडे या,भुन भुन सुरु केलि.पण अनिकेत तो....असा सहज पट्नारा थोडीच.त्याने मला तू समर मधे इकडे ये.तुला घरी तरी काय काम आहे?????असे बोलून माझा ब्रेन वाश सुरु केला.
             बदल इतका की आधी परदेशात स्वारस्य नसलेली मी,आता पुढील समर मधे नक्की येइन असे सांगू लागले.मला देश आवडला,अनिकेत बरोबर,नंदिनी बरोबर राहता आले,म्हनुनच हा बदल माझ्यात झाला.
            पण नंतर येताना मनाची पक्की तयारी करून,वेळ जावा या साठी पुस्तके,सीडीज ,भरतकाम बरोबर घेउन आलो पाहिजे तरच वेळ आनंदात जाइल हे नक्की.

No comments:

Post a Comment