माझ्या या इकडच्या वास्तव्यात मी अनिकेत च्या ३ मित्रांकडे पार्टी ला [जेवायला]गेले.दिवाली च्या दिवशी शिल्पा-दिनेश यांच्या कड़े गेलो होतो.शिल्पा आणि नंदिनी एकत्र काम करतात.त्यामुले त्यांची पण चांगली मैत्री झाली आहे.शिल्पा घरी आली होती,पार्क मधे आली होती,त्या मुले ओळख झाली होती.
दिवाली म्हणून आम्ही रवि -रिचा,वेकट-वैजू याना घरी बोलावले होते.त्यामुले त्यांची पण छान ओळख झाली.वेंकट चे नाव मी अनिकेत कडून खुप वेळा एइकले होते.आधी तो डोम्बिवली ला राहणारा.जुन्या आठवणी काढून गप्पा मारल्या.
वैजू ने सर्व मित्र मैत्रिणी ना घरी वडा-पाव पार्टी ला बोलावले होते.नविन मित्र आले होते,ओळख झाली.गप्पा मारल्या वेळ छान गेला.
रवि-रिचा शेजारी असल्याने माझे अगदी पहिल्या दिवसापासून माझे जाणे येणे सुरु झाले होते. त्याना पण घरी मेहुंन म्हणून बोलावले होते.रिचा कड़े मी २/३ वेळा गेले जेवायला.दर वेळी मेनू वेगला ही तिची खासियत.थाय करी भात,पास्ता,तुर्की मिठाई असा वेगला बेत होता.माझी आवडती डीश ओली भेल आणि चहा यानि सुरवात झाली.मस्त गप्पा मारत जेवलो.आशीष ,मिनी पण आले होते.छोटा आरुष मस्त टाइमपास करत होता.रिचा चे घर अगदी टाप टिप ,नीट नेटके असते.कामा वरून घरी येवून सर्व तयार करून ठेवले होते,मला कौतुक वाटले. कोकणस्थ साटप असतात हे मला परदेशात पण जाणवले.
म
Friday, November 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment