Sunday, October 11, 2009

             धब धबे पाहून झाल्यावर हाताशी थोडा वेळ होता ,लगेच क्रुझ सफर करू या ठरवले.आणि इन्तेरलाकन ओसत ला आलो,एक बोट नुकतीच गेली होती.त्यामुले ४० मिनिटे गप्पा मारत टाइमपास केला.अनिकेत ने जाऊँन ग्लेशिएअर एक्सप्रेस ची तिकिटे काढली.मोठ्या सुसज्ज बोटीचा अनुभव पण प्रथमच.बोटीत वर बसावे विचार करून चढलो.पण आम्हाला परत खाली यावे लागले,कारण तो फर्स्ट क्लास साठी होता.बोटीत पण सगलीकडे मस्त कारपेट होते.३०० लोक बसू शकतील अशी सोय होती.गार वारा,थंडी याचा त्रास नको म्हणुन बंद रेस्टोरंट होते.काचेतून सृष्टि सौन्दर्य बघता येत होते.इथेही लोक आरामात बियर घेत टाइमपास करत होते..कारण ही फेरी अडीच तासाची होती.प्रथम बाहेर बसलो पण गारठा वाढू लागला तसे आत आलो.अनिकेत बियर अणि आम्ही दोघिनी चहा घेतला.चहा घेणारे आम्ही २/४ भारतीय च होतो.इकडचे सर्व वयाचे लोक आयुष्याचा उपभोग छान घेतात.मस्त एन्जॉय करतात.याना काही चिंता नसतीलच का???????????पण घर घर करत ते अडकून पडत नाही हे मात्र नक्की.आपण त्यात गुंतलेले असतो,उपलब्ध असेल तरी आपण उपभोगु शकत नाही.असे असले तरी आपली संस्कृति उ़त्तम........एकमेकानी एकमेकांच्या भावना समजुन घेतल्या नाही तर काय रुक्ष जीवन जगायेचे???????????
                    बोटी तुन उतरलो.आज ताज मधे जेवायला जायेचे होते.तिकडे अगदी चविष्ट जेवण होते.चिकन मस्त ,पण लस्सी पण मस्त होती.त्या मानाने खिशाला झेपतिल असे दर होते.त्याच एका होटल मधे स्क्रीन वर हिंदी गाणी बघता आली.नाहीतर हिंदी इंग्लिश नाहीच,मराठीचे तर नावच नको!!!!!!!!!!!!!!!!!जेवून परत आलो.दुसर्या दिवशी अजुन एका डोंगरावर जायचे होते.

No comments:

Post a Comment