Thursday, May 19, 2011

पहिला वीकएंड

अश्विनी आल्यावर परत आम्ही सर्व एकत्र जेवलो.त्या नंतर अनिकेत अमोल कामावर गेले.मी नंदिनी आणि अश्विनी कटी तरी तास सोफ्यावर बसून गप्पा मारत होतो.एकदाच्या सर्व लोकांना या मुलीच्या भाषेत कुटून काढले.एकीकडे अश्विनी अक्षराची काळजी घेत हती.तिला खाऊ पिऊ घालत होती.एकट्या मुली रहिल्या कि त्यांना लहान मुलांचे संगोपन चांगले जमते,याची परत एकदा जाणीव झाली.

नंतर आम्ही बाहेर पडलो. अचानक मंजिरी कडे जायचा बेत ठरला.त्यावेळी मी लगेच खाऊ आणि खरेदी केलेल्या वस्तू पिशवीत भरल्या,सर्व गिफ्ट पण मंजिरी कडे जाताना बस stop पासून थोडे अंतर चालत जावे लागते.इकडचे विशेष म्हणजे सरळ सपाट भाग नाही. रस्त्यावरून थोडेसे चढावावर चढून जावे लागते.उंच सकाळ भाग खूप आहे.मंजिरी च्या घरची बेल वाजवली.गेट उघडून दारापर्यंत १०/१५ पायर्या उतरून जावे लागते.दोन्ही बाजूला छान वेळी फुलझाडे बघून बंगल्याची कल्पना आली.मंजिरी चे घर किती प्रशस्त आहे सांगू?तळ मजल्यावर मोठे २ hall, किचन,डायनिंग रूम,व पाठीमागे डेक खाली मस्त गवत हिरवेगार,फुलझाडे,फळझाडे मस्त,पाठीमागे मोठे गेरेज आणि स्टोर रूम.

पहिल्या मजल्यावर ३ बेडरूम.आयुष ची रूम मला जास्त आवडली.किती पुस्तके इतक्या लहान मुलाकडे गोष्टीची.बाप रे!तो रोज वाचत झोपतो.सवय छान ना लहान पानापासून वाचनाची.त्या नंतर मंजिरी च्या बेडरूम मध्ये बसून आम्ही दोघींनी हितगुज केले.लवकरच ४ दिवस तरी एकत्र राहायचा बेत केला.त्य नंतर दुसर्या मजल्यावर भली मोठी गेस्ट रूम.१० पाहुणे आले तरी काही अडचण नाही.असे छानसे घर पाहून मला अनिरुद्ध चे खूप कौतुक वाटले,आणि समाधान....माही,अक्षरा,आयुष यांच्याशी खेळण्यात कुठे वेळ गेला कळले नाही.

रात्री तिकडे जेवून यायचे ठरले,अनिकेत अनिरुद्ध घरी आल्यावर गप्पा ना अधिक रंग चढला.खूप दिवसांनी पानसे छत्रे एकत्र जेवताना भाग्यश्री ची कमी जाणवली,पण मजा आली.रात्री घरी यायला माझा पाय निघत नव्हता .पण उद्या भेटू ठरवून निघाले.आता रात्री मात्र मला खूप झोप आली होती,आणि दमले पण खूप होते.बडबड न करता,टी.व्ही न पाहता झोपून गेले.

सकाळी उठयावर छान ताजे तवाने वाटत होते.इकडे समर मध्ये सकाळी ४ वाजता उजाडते,समर कसला ??दिवसा १५ ते १७ degree तापमान आणि रात्री १०.मला तर थंडीच वाटते.मुंबई चा उकाडा त्यातून मी इकडे आलेली.सकाळी आम्ही युरोपियन पद्धतीचा चांगला तगडा नाश्ता केला,[sandvich], अंडी,चीज,salaed सर्व शरीरासाठी वजनदार गोष्टी] अनिकेत mittingला आम्ही दोघी mall मध्ये जायला बाहेर पडलो.तिथे आपल्यासारखीच जत्रा होती.असंख्य दुकाने,वेगवेगळे सेल लागलेले,सर्व दुकानात फोरून पायाचे तुकडे पडले.मग जरा mcdonald मध्ये विसावलो.मग पुन्हा फिरस्ती सुरु,अखेर एका दुकानात नंदिनी ने खरेदी केली.त्या नंतर parlour मध्ये गेलो.

इकडे गुजराथी आणि पंजाबी लोक खूप व्यवसाय करतात नंदिनी ने माहिती दिली.इकडे ३ पौंड मध्ये आयब्रो करून मिळतात.मी आपले भारतीय रुपयात २१० रुपये असे मनाशीच म्हटले.पण इकडे एक गोष्ट लक्षात आली,सर्व जण एकत्र भेटले कि कुठे काय केवढ्याला मिळते याची चर्चा करतात.आपल्यकडे तसे होत नाही.भाव इकडे सर्वा ठिकाणी सारखे नसतात.आपल्याकडे फरक असतो पण फारसा नाही.असो.खूप फिरून पाय दुखू लागले.घरी परतलो.विश्रांती घेतली.आम्हला परत रात्री अनिकेत च्या मित्राकडे पार्टी ला जायचे होते.

आता मात्र बाहेर गारठा वाढला होता.झोंबरा वारा खूप होता,पण आवरून निघालो.मला न्यायला अनिरुद्ध आला इतके बरे वाटले.आता चालायची खरच ताकद नव्हती. सर्व एकत्र जमून timepass सुरु.पंजाबी सामोसे,आणि ज्यूस ने सुरवात झाली.इकडच्या पद्धती प्रमाणे आम्ही बायकांनी आधी जेवून घेतले.नंतर पुरुष,खरच बरे वाटले.नाहीतर आपल्याकडे बायकांचे जेवण चुलीत!!या म्हणी प्रमाणे होते.खरच प्रगत देशातील बदल चांगला वाटला.जेवून खाऊन गप्पा मारून रात्री उशिरा घरी परतलो.मुंबई सारखी रहदारी होती.

पार्टी कसली ते सांगायचे राहिलेच कि....मित्राचा मुलगा एक वर्षाचा झाला त्याची पार्टी.आपल्या मुलुंड च्या ४ पटमोठे इकडे एक खेळण्याचे दुकान आहे.० ते १४ वयाच्या मुलामुलींची खेळणी पाहून वेड लागायची वेळ आली होती.एक वर्षाच्या मुलाला काय घ्यावे या बद्धल एक मत झाले आणि आम्ही एक सोफा ची असते तशी खुर्ची घेतली.मस्त pack केलेली.पण त्याला गिफ्ट pack करून देत नाहीत.म्हणून एक भला मोठा पेपर घेतला.मला तिकडे वाल्स ice क्रीम दिसले.अरे आपल्या कडचे इकडे असे वाटले,पण तेव्हा कळले कि ते मूळ इकडचे..

रविवार सकाळ सर्वांनी नाश्ता आणि जेवण या मधील म्हणजे ब्रंच करायचे ठरले,ते सुद्धा चेन्नई डोसा मध्ये.सर्व म्हणजे १२ जण .फोनाफोनी झाली.अनिकेत चा मित्र तिकडे १०.३० ला पोचला.त्या वेळी पानसे छत्रे घरी निवांत होते,तिकडे गेल्यावर समजले त्याला कि आज दुकान उघडणार नाही,परत फोनाफोनी सुरु.मग tutin [एक भाग]ला जायचे ठरले.परत श्याम मला घ्यायला आला.अनिरुद्ध चा तो खरा मित्र,त्याच्या सारखाच शांत,समंजस.आम्ही तिकडे पोचलो.पण तिकडे पण दुकान बंद..मला एकदाची आठवण आली,शिव सेना /म.न.से.कोणीतरी बंद पुकारला कि कसे होते तसे वातावरण होते.इकडे पण सर्व दुकाने दुपारी २ वाजता रविवारी बंद होतात.काही ठराविक बार,पब,दुकाने असतात सुरु.जसे आपल्याकडील २४ तास मेडिकल स्टोर सारखे.अखेर एका चेन्नई डोसा मध्ये गेलो.उडपी पदार्थ सर्वांनी आवडीने खाल्ले.सोबत mango लस्सी ,कॉफ्फी .

आता पेटपूजा झाल्यावर खरेदी ,भाजीपाला किराणा,आंबे,फळे सर्व....आंबे तर सर्वांनी घेतलेच.इकडे सर्व भाज्या फळे मिळतात,अगदी भाजीचे आळु पण.नारळ वड्या करायला नारळ,चिवडा चे सामान मी लगेच घेतले,कारण या वेळी करून आणले नव्हते.सर्व आमच्या घरी आले,परत चहा पाणी गप्पा,आणि पुढील बेत सुरु.शनिवार रविवार स्कॉट लंड ला जायचं बेत ठरला.आरक्षण सुरु.तिकडे पण सर्व १२ मोठे आणि बच्चे कंपनी .

बाकी सर्व घरी गेले,अश्विनी अमोल अक्षरा थांबले होते.मी गरमगरम पोळ्या केल्या,नंदिनी ने भाजी केली.सर्वांनी ताव मारला.त्या विकतच्या पोळ्या खाऊन खरच ही मुळे कंटाळली आहेत,gas शेगडी नाही इकडे हॉट प्लेट वर थोड्या पोळ्या कडक होत आहेत,जमेल हळू हळू.तो पण एक अनुभव.

1 comment:

  1. Good one, now we know how u pass ur time. We were thinking about all the time. I dont hv ur EMAIL ID, and ur email i think not directed to my correct address (SUHAS_VARADKAR@HOTMAIL.COM) Pl write again. R U on FaceBook? we can chat there. What time is convenient for u to talk? now it is 10.30pm here, what is ur time there? How is Aniket? Enjoy ur stay and do write so that Tile can talk to u. thanx. good night sorry morning!

    ReplyDelete