अनिकेत इतके दिवस परदेशात जातो पण मला कधी वाटले नाही त्याच्या तिथी जावेसे. का?विचार्लत तर, खरच काही कारण नाही.
पण नंदिनीने (माझी सून) माझा पासपोर्ट करून घेतलाच. अन भाग्यश्री सासरी गेल्यावर मला जायला काहीच अड़चन राहिली नाही. अनिकेत ला होकार दिला आणि कामाला सुरवात झाली.पण मी जरा शांत होते .आजीची (माझी आई) काल्लजी होती. वयोपरत्वे तिची तब्बेत ढासळत होतीच व तिला खुप वेदना ही होत होत्या. आई ठीक नव्हती म्हणून मन तयार होईना. माझी घालमेल बघून आईला रवि (माझ्या भाऊ) कल्याणला, त्याच्याकडे घेऊन गेला आणि काही दिवसातच तीदेवाघरी गेली. सुटली ती.
आता मी जाताना विचार तीचा नव्हता. तयारी करू या ठरवले, आणि मी, माझ्या परदेश गमनाचे पहिले पाऊल उचाल्ले !!!!!!
Monday, September 14, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment