Friday, September 18, 2009

काल मी अणि अनिकेत खुप दिवसानी चालत बाहेर फिरत होतो.मला एकटीला जायला जमावे म्हणून तो रोड दाखवत होता.जाताना अनेक चौक लागले पण वाहतुक पोलीस कुठेही नाही,मला आता इकडे येवून ८ दिवस जाले  होते,पण एकदाही रोड वर पोलीस दिसले नाहीत.
     एकाद्ची मुले रोड वर क्रिकेट खेलत नाही.घरचा तलमजला खिडक्या काचेच्या ,पण काचा फुटत नाही,या उलट खिडकीतुन छान दिसतील अशाआकर्षक वस्तु ठेवलेल्या असतात.
     रस्त्यात कचरा कुण्डी म्हणजे मोठे ४ बॉक्स पत्र्याचे असतात.एकत कचरा,एकात बाटल्या,अणि एकात न्यूज़ पेपर असे टाकावेलागते.रद्दीवाला नाही.
     कालवे छान आहेत बोटिंग होते.पण बाजूला कुठेही खायेचे पदार्थ गाड़ी नाही.भेल पनिपुरिवाला हवा ना?निदान पिजा तरी.पण काही नाही,शुद्ध हवा खाने फुकट......
     घराच्या बाहेर रोअड्वर सगलीकडे फुलज़डेखुप,सर्व फुलानेबहरलेली.कोणीही फुले ,कल्या तोडत नाही,नाहीतर आपल्याकडे ?
     कोणत्याही गाडीतून धुर येताना मला अजुन दिसला नाही,पर्यावरण चांगले राहीलच ना?
    बाहेर फिरताना सतत मनात अशी तुलना चालू होते पण काय इलाज ........एक दिवस आपल्याकडे होइल असे सारे स्वप्न तरी बघू या.

1 comment:

  1. yes even i feel the same in dubai, when will we enjoy or get all this pleasure of leaving in mumbai.????????????

    ReplyDelete