Friday, January 8, 2010


एक कथा.........
                       एका मध्यम वर्गीय महिलेची कथा तिच्याच शब्दात.....आज मी सकालीच उठुन काहितरी वेगले करावे असा विचार केला.काय करावे?चाकोरी बाहेरचे काही तर मला करता येणार नव्हते.कारण मी पड्ले मध्यम वर्गीय महिला.तेव्हा जे सर्वे करतात तेच आपण केले पाहिजे....समाजाविरुद्ध जाऊन चालणार नव्हते.बदल हवा वाटणे ,अगदी सहज प्रवृत्ती.पण तो बदल पण पटकन स्विकारता येत नव्हता.पण अखेर एक दिवस मी स्वभावाच्या थोडे वेगळे वागायला सुरवात केली.अर्थात घरातल्याना ,मुलांना ते पटणारे नव्हते.पण एका क्षणी मी पक्का मनाशी विचार केला ,कि मी आता फक्त माझ्यासाठी  जगणार......विचार चांगला पण आमलात आणणे कठीण जात होते.वागायला सुरवात तर केली.झाला तर माझा फायदा च होणार होता.नुकसान नक्की नाही.
                      एक दिवस एक वेळ अशी आली कि मला आपण एकटे आहोत याचे वाईट वाटू लागले.आपल्या मनातील सुख दुख सांगावीशी वाटू लागली.पण कोणाला सांगणार?मुले आपल्या संसारात रमली आहेत.त्यांना सांगून काही फायदा नाही,आणि त्यांच्या संसारात आपण विरजण  घालायचे नाही ,मनाशी पक्का निर्धार केला कि यापुढे आपले दुख अडचणी त्यांना सांगायच्या नाहीत.आणि तसे वागायला सुरवात पण केली.या गोष्टीचा सुरवातीला मला त्रास होऊ लागला.कारण त्या मुळे बोलायला काही विषयच राहत नसे.यातून मला एकटीला गप्प बसून राहायची सवय लागली.समाजप्रिय मी पण आता सरावाशी बोलणे मला जमत नव्हते.सतत मनाशी बोलणे विचार करणे सुरु झाले.यातून एक नको ती उपाधी माझ्या मागे लागली.ती म्हणजे डिप्रेशन ....याचा त्रास पण अनुभवला.जाणीव झाली यातून बाहेर पडायला हवे.झोप न लागणे ,रडू येणे,जेवण नकोसे वाटणे हे सर्वे सुरु झाले.आणि तरी वजन मात्र वाढू लागले.तेव्हा डॉक्टरना गाठले.माहित होते कि ते औषधे देणार ,त्याने झोप लागेल मनाला उत्साह वाटेल.झाले तसेच जोवर औषधे सुरु होतितो पर्यंत ठीक होते.पण परत ये रे माझ्या मागल्या!सव त्रास परत सुरु झाला.मला औषधाच्या आहारी जायचे नव्हते म्हणून थोडा त्रास मी सहन पण केला.औषधे घेतली नाहीत.पण काहीच दिवसांनी मला खूप बेचैन वाटू लागले.थकवा तर कमालीचा आलांनी रडणे तर आवरू शकत नव्हते.अखेर औषधांना शरण आले आणि परत घेणे सुरु केले.२/३ दिवस घेतल्यावर फरक पडला.मनात हाच विचार आला कि आपण असेच सतत औषधावर अवलंबून राहायचे का?पण खरच असे काही जीवनात क्षण असतात कि ते आपल्याला बेचैन करतात,कसे वागावे?काय बोलावे सुचतच नाही.समोरचे आपल्या  बद्धल काय विचार करत असतील?हा विचार करून पण मन अगदी थकून जाते....अखेर आपण आपल्या हाती काही नसल्याचे मान्य करतो.परमेश्वराचे नाव घेतो,पण मन रामातेच असे नाही.तर तो एक उपाय असतो...........!

No comments:

Post a Comment