Tuesday, October 6, 2009

डोंगराच्या कुशीत वसलेल्या या छोट्याशा गावात इन्तेरलाकन वेस्ट ला आम्ही पोचलो,फलाट रोअदला लागुनच होता.लगेच बाहेर पडलो.स्टेशन पासून ५ मिनिट अंतरावर होटल होते.चालत जाताना गाव बघयेला सुरवात केली.स्विस वॉच ची सर्वात जास्त दुकाने दिसली.होटल वर पोचलो,मस्त होटल .प्रशस्त खोल्या,सगालिकडे गालीचे,मस्त सजावट.खोलीतून निसर्ग सौन्दर्य अप्रतिम दिसत होते.थंडी होती पण मला झेपत होती.विंटर सुरु होणार याची तयारी सुरु झाली होती.आता तिकडे हल्लो इन फेस्टिवल असते,त्यासाठी लाल भोपले सगलीकडे सजवाटित ठेवलेले दिसले.कोणाचे नशीब कुठे?भोपले ....जरा वेळ बाहेर फेर फटका मारून स्पाइस या इंडियन होटल मधे जेवायला गेलो.अगदी पुण्याच्या तुलसी बागेतून आणलेली ताम्ब्याची भांडी आणि लाकडी बाहुल्या सजावट होती.ते पाहून मला नवल वाटले.सकाळ पासून नीट जेवण झाले नव्हते.गप्पा मारत जेवणावर ताव मारला.आणि होटल वर परत आलो.दुसर्या दिवशीचा प्लान ठरवून झोपलो.दमलो होतो तसे पण दुसर्या दिवशी बाहेर जायेचे डोक्यात होते.
                  सकाळी लवकर उठून एकेक जन तयार झालो.होटल मधेच ब्रेक फास्ट ची सोय होती.इकडे रूम सर्विस नसते.एका प्रशस्त हॉल मधे टेबल खुर्च्या टाकुन होटल सारखी सोय असते.बूफे पद्धत.चहा ची रोज ची सवय असल्याने प्रथम चहा घेतला.इकडे अपल्यासरखा कड़क चहा नाही.गरम पाणी,डिप-डिप चा येल्लो लेबल लिप्टन टी आणि दूध साखर घालून चहा करून घेणे .हीच पद्धत .पण तरी चहा होतो तो यामूले बरे वाटले.नंतर बूफे कड़े गेलो.अरे बाप रे !!!!!!!किती प्रकार ,आणि सकाळी ७ वाजता हे खायेचे?????पण काही नाही दिवस भर बाहेर फिरायेचे तर सकाळी पोट भरून घ्यायचे हा जणू इकडचा नियमच.ब्रेक फास्ट ला ब्रेड चे विविध प्रकार ,पण मला आवडलेला त्यातील क्रोइस्संत [चन्द्र कोरी सारखा दिसणारा नरम पाव ]..चीझ ,बुट्टर,जाम.अंडी कच्ची ठेवलेली ,तुम्हाला कशी हावी तशी खा ,उकडून ओम्लेट करून.जूस २/३ प्रकार चे दूध सिरियलस ,फले कापून ठेवलेली ,चिकनचे विविध प्रकार,आणि बरेच इतर काही .मला नावे सुधा कलली नाहीत,असे प्रकार खुप होते.पण न लाजता सर्वेजन पोटभर खात होते.तयार कापलेली फले मात्र मी रोज खात होते,आवडीने.नाही तर आम्हा बायकाना घरी कोण देणार सकाळी अशी फ्रूट डिश!!!!!!!!
     होटल मधे एक छान गोड मुलगी वेटर चे काम करत होती अगदी आपुलकीने गोड बोलत होती,विचारत होती.मला तिची भाषा समजत नव्हती ती भाग वेगला.पण अनिकेत होता त्याने भाषेची अड़चन नवती तो सांगत असे काय ते.
बस ने आम्ही इन्तेरलाकन ओसत ला आलो.नंतर ३ गाड्या बदलून आम्ही शेवट च्या ग्रिन्देल्वोल्ड गाडीत बसलो.वैशिष्ट्य म्हणजे इतक्या वेळेवर टाइम टेबल नुसार गाड्या चालतात कशा?याचे नवल वाटते.याहून पुढे कमाल म्हणजे कनेक्शन .एका गाडीतून उतरतो तर त्याच फलाटावर समोर दुसर्या बाजूला गाड़ी हजर......प्रवाशाची अशी सोय असल्याने ४ गाड्या बदलायला काही त्रास वाटला नाही,नाही तर कल्याण हुन मुलुंड ला येताना थाना गाड़ी बदलने किती व्याप करावा लागतो.पण यूरोपियन लोकाचे सर्व आराम शिर ,सुखकर करने याकडे विशेष लक्ष .प्रवासात निसर्ग सौन्दर्य बघताना डोल्याना सुखद वाटत होते.

No comments:

Post a Comment